मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील : राजेश टोपे

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील : राजेश टोपे

तीर्थपुरी : मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही देतांनाच शेतकरी, तरुण, महिला, विद्यार्थी अशा सगळ्याच घटकांसाठी आपण गेल्या वीस वर्षात कामे केली आहेत, यापुढेही आपला तोच प्रयत्न असेल अशी ग्वाही राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांनी तीर्थपुरी येथील प्रचार सभेत शुक्रवारी दिली. 

राजेश टोपे यांचा प्रचार शेवटच्या टप्यात असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. वीस वर्ष केलेल्या विकासकामाच्या जोरावर मतदारांनी आपल्याला पुन्हा संधी द्यावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. तीर्थपुरी येथे बोलतांना टोपे म्हणाले, मतदार संघात विविध विकास योजनेच्या माध्यमातून कामे केली असून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यामुळे याठिकाणी मुला मुलीच्या शिक्षणाची सोय निर्माण झाली. रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी आपण या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र लवकरच सुरू करणार आहोत. 

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी समर्थ व सागर सहकारी साखर कारखाने उभारले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. आपण विकासासाठी राजकारण करत असून या भागातील गोदावरी नदीवर बंधारे उभारून शेतकऱ्यांना मुबलक पाणी निर्माण करून दिले आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायम सोडविला आहे. गोदावरी नदीच्या भागात 33 के.व्ही.उपकेंद्र निर्माण केले करून अखंड वीज मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तीर्थपुरी येथे 132 केव्ही केंद्र मंजूर केले असून सेना-भाजप सरकारच्या कार्यकाळात उभारणीसाठी गती मिळाली नाही. परंतु येत्या कार्य काळात ते पूर्ण होईल. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅंका वेळेवर कर्ज पुरवठा करत नसल्याने समर्थ बॅंकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. सामान्य माणूस केंद्र बिंदू माणून विकास करत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 
ऊसाला सर्वाधिक भाव दिला 
शेतकरी दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन केले. पिक विमा मिळाला नाही त्यासाठीही वेळोवेळी आंदोलन करून पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी कोर्टात धाव घेतली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत काम केले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते आहे. शेतकऱ्यांच्या उसाला अधिक भाव मिळावा यासाठी इथेनॉल प्रकल्पाची उभारणी करणार आहे. समर्थ व सागर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला असून पुढील वर्षी हंगामातील उसाला 2 हजार आठशे रुपये भाव देणार आहे. विरोधकाकडे विकासाची दृष्टी नाही. विकासाची दृष्टी नसल्याने सेना भाजपची सत्ता असताना मतदार संघात त्यांना विकासासाठी निधी आणता आला नाही. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विकासामध्ये सातत्य राखण्यासाठी पुन्हा संधी द्या असे आवाहन राजेश टापे यांनी यावेळी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com