गोरेंसारख्या आमदाराची भाजपला गरज नाही: येळगावकर 

गोरेंसारख्या आमदाराची भाजपला गरज नाही: येळगावकर 

राजकीय अपडेटसाठी सरकारनामाचे ऍप डाउनलोड करा.  
सातारा: सातारा जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार निवडून आणण्यासाठी पक्षात धमक आहे. तुमच्यासारख्या आमदारांची पक्षाला गरज नाही. तुम्ही आता पुन्हा माण मतदार संघातून निवडून येवून दाखवा मग बोला, असा टोला भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावर यांनी पत्रकार परीषदेत लगावला. 

जयकुमार गोरे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय जरी झाला तरी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची मुस्कटदाबीच झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली भुमिका बदलली नाही तर माझी भुमिका वेगळी असेल. यामध्ये भाजपचे तीन आमदर निवडुन आल्यास अश्‍चर्य वाटायला नको, असा सूचक विधान केले होते. यावर आज कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील व कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे यांनी प्रसिध्दी पत्रकातून जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला होता. 

आमदार गोरे यांनी केलेल्या विधानावर भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावर यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यात भाजप आमदार निवडून आणण्यासाठी खंबीर आहे. पक्षात तेवढी धमक आहे. तुमच्यासारख्या आमदाराची पक्षाला गरज नाही. आमच्या पक्षाचे आमदार निवडून येतील पण आपण निवडून याल का? हे बघा. मतदार संघात आपला किती जनाधार आहे, हे येणारा काळच दाखवून देईल असा टोला त्यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in