# MPSC : आरक्षणाच्या निर्णयानंतरही आम्ही 'अनाथ'च....

राज्यसेवा अंतीम निवड यादीत अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतरदेखील या प्रवर्गातील मुख्य परीक्षा दिलेल्या चार विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलविण्यात आले नाही.
MPSC_candidates.j
MPSC_candidates.j

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यसेवा अंतीम निवड यादीत अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतरदेखील या प्रवर्गातील मुख्य परीक्षा दिलेल्या चार विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलविण्यात आले नाही. त्यामुळे या प्रवर्गासाठी एक टक्के आरक्षण असूनही आपल्याला डावलल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दोन एप्रिल २०१८ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक टक्के आरक्षण ठेवण्याची निर्णय झाला. त्याचा शासन निर्णयदेखील प्रसिद्ध झाला. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षेला या प्रवर्गातून अनेक अर्ज आले. मात्र, योग्य कागदपत्रांची तपासणी करून चार विद्यार्थी निघाले.

२० ऑगस्ट २०२० रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या चार विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी देऊन या त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात यावे, असे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र, मुख्य परीक्षा दिलेल्या य चार विद्यार्थ्यांचा मुलाखतीसाठी विचार करण्यात आली नाही.

या संदर्भात या प्रवर्गातून परीक्षा दिलेली विद्यार्थिनी अमऽता करवंदे यांनी लोकसेवा आयोग तसेच राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे अनाथ प्रवर्गाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, अंतीम निकालात या विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाचा विचारच करण्यात आला नाही. निकाल जाहीर झाल्यानंतरही त्यांनी आयोगाकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडे  पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी असो वा लोकसेवा आयोगातील अधिकारी कुणीही दाद द्यायाला तयार नाही.

राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरदेखील या प्रवर्गाचा समावेश का करण्यात आला नाही, याचे उत्तरदेखील कुणी द्यायला तयार नाही. एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर किमान प्रवर्गाचा समावेश का झाला नाही, याचा खुलासा किंवा साधी माहितीदेखील आयोगाकडून देण्यात येत नाही.

या संदर्भात बोलताना अमृता करवंदे म्हणाल्या, ‘‘या विषयात सुरवातीपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यसेवा परीक्षा देऊनही आम्हाला डावलण्यात आले. हा आमच्यावरचा मोठा अन्याय आहे. स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी आम्ही आमचे करियर पणाला लावले आहे. अनाथांसाठी आरक्षण मिळावे म्हणून कष्ट घेतले आहेत. मात्र, इतक्या  प्रयत्नांनंतरही आयोगाने साफ दुर्लक्ष केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील ठरावदेखील आयोगाने पाळला नाही.’’

हेही वाचा : राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार
 
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची निवड निश्चित झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा सरकारकडून होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. विद्यमान मुख्य
सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास सरकारने नकार दिला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मुख्य सचिवपदी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय
कुमार यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संजय  कुमार यांच्या सेवा ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना
ही नियुक्ती मिळाली आहे. मेहता यांना चौथ्यांदा मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारात्मक होते. मात्र, काँग्रेसने विरोध केल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेहता यांना आपल्या स्वत:च्या सेवेत घेतले आहे.
विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून, संजय कुमार हे 1 जुलैला आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव
असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत असून, 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि
दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध
महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची  तसेच, नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com