मुंबईत शिवसेनेला, तर सोलापुरात मोहिते पाटलांना मानणारे नारायण पाटील मराठवाड्यास पाणी देताना गप्प का होते ?

त्याच जेऊर गावाच्या खालून हा बोगदा काढून मराठवाड्याला हे पाणी दिले जात आहे.
Why did Narayan Patil remain silent while giving water to Marathwada from Ujani? MLA Sanjay Shinde
Why did Narayan Patil remain silent while giving water to Marathwada from Ujani? MLA Sanjay Shinde

सोलापूर : माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे कोणाचेच नाहीत. भाजपची सत्ता असताना त्यांनी भाजपची हुजरेगिरी करत त्यांच्याकडून  कामे करून घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवारांनाही आम्ही तुमचेच असल्याचे सांगून ते पवारांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी शिंदे बंधूंवर केली होती. त्याला आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबईत गेल्यावर नारायण पाटील (Narayan Patil) हे शिवसेनेचा आहे, म्हणून सांगतात आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या मोहिते-पाटील यांचे नेतृत्व मानतात. नारायण पाटलांचा दुटप्पीपणा आता जनतेने पुरता ओळखला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे 2004 मध्ये उपमुख्यमंत्री असताना उजनी (Ujani) धरणातून मराठवाड्याला (Marathwada) 21 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय होताना नारायण पाटील गप्प का बसले होते? असा सवाल आमदार संजय शिंदे यांनी उपस्थित केला. (Why did Narayan Patil remain silent while giving water to Marathwada from Ujani? MLA Sanjay Shinde)

मोहिते पाटलांना विरोध नको म्हणून तेव्हा पाटील गप्प बसले

इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्यासाठी नुसता सर्व्हेक्षणाचा आदेश काढल्यानंतर जशी तुम्ही आक्रमक भूमिका घेतली. तशीच भूमिका 2004 मध्ये उजनीतून मराठवाड्याला 21 टीएमसाठी पाणी देताना घेतली असती तर सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी वाचले असते. जिल्ह्याचे आणि करमाळा तालुक्‍याचे नूकसान झाले तरीही चालेल परंतु मोहिते-पाटील यांच्या विरोधात भूमिका नको, अशीच नारायण पाटील यांची आजपर्यंत भूमिका राहिली असल्याचे तालुक्‍याने आणि जिल्ह्यानेसुद्धा पाहिल्याचा टोलाही आमदार संजय शिंदे यांनी लगावला. 

तुमच्या गावातून पाणी नेले जात असताना तुम्हाला दिसले नाही का
उजनीतून मराठवाड्याला दिल्या जाणाऱ्या 21 टीएमसी पाण्यापैकी सात ते साडेसात टीएमसी पाणी उजनीतून थेट दिले जात आहे. माजी आमदार नारायण पाटील ज्या जेऊर (ता. करमाळा) गावात राहतात, त्याच जेऊर गावाच्या खालून हा बोगदा काढून मराठवाड्याला हे पाणी दिले जात आहे. मराठवाड्याला पाणी दिलेले तुम्हाला दिसले नाही का? असा खोचक सवालही आमदार शिंदे यांनी माजी आमदार पाटील यांना विचारला. 

मराठवाड्याला पाणी नेताना का विरोध केला नाही

उजनीतून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी देण्याच्या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश निघाले होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील काही जणांनी या पाण्यासाठी जेवढा विरोध केला तेवढाच विरोध मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी देत असताना करायला हवा होता. जिल्ह्याच्या वाट्याचे आणि हक्काचे पाणी वाचले असते, अशी अपेक्षाही आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. 

येत्या काळात सोलापूरला मोठा फटका बसणार

अनुशेषामुळे मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी नेण्यासाठी आवश्‍यक असलेल्या योजना आता पूर्ण होत आल्या आहेत. येत्या काही दिवसांत हे पाणी मराठवाड्याला जाईल. उजनीत येणारे पाणी हे पश्‍चिम महाराष्ट्रातून येत असल्यामुळे या योजनेसाठी मात्र पुरेशा प्रमाणात निधी मिळू शकला नाही. उजनीत पाणी येण्यापूर्वीच मराठवाड्याला उजनीतून पाणी जाणार आहे. त्याचा मोठा फटका येत्या काळात सोलापूर जिल्ह्याला सहन करावा लागेल, अशी भीतीही आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com