मुंबई : आमचे आमदार निलेश लंके यांनी मला पारनेरचे ते पाच नगरसेवक अपक्ष असल्याचे सांगितले होते. मी त्यांना राष्ट्रवादीत घेतल्यानंतर ते मला शिवसेनेचे असल्याचे कळाले. ते भाजपमध्ये चालले होते. म्हणून त्यांना राष्ट्रवादीत घेतले. मात्र जे झाले ते लक्षात आल्यानंतर निलेश लंकेंना त्यांना परत घेऊन जायला सांगितले, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या प्रश्नांवर दिले.
पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना अजित पवार यांच्या उपस्थिती बारामती येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावरून महाआघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत तणाव निर्माण झाला होता. हे नगरसेवक काल पुन्हा शिवसेनेकडे पाठवून देण्यात आले.
याबाबत आज अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. ``मी बारमतीत असताना बरीच गर्दी झाली होती. त्या गर्दीत आमदार लंके यांनी मला या नगरसेवकांविषयी सांगितले. ते अपक्ष असल्याचे सांगितल्याने त्यांचा प्रवेश केला. पण ते शिवसेनेचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माझ्याही मनाला ते पटले नाही. या आधी राज्यात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे सरकार असताना आम्ही कार्यकर्त्यांना एकमेकांकडे घ्यायचो नाही. पारनेरबाबत जे झाले ते लक्षात येताच निलेश लंकेंना त्यांना परत घेऊन जायला सांगितले. या साऱ्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री नाराज नाहीत. ते शब्दानेही काही बोललेले नाहीत. त्यामुळे आता या बातम्या बंद करा, असेही त्यांनी सांगितले.
Edited By- Yogesh Kute
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.