मुंबई : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत प्रत्येकानं सामील व्हावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्वयंसेवक आता प्रत्येक घरात पोहचून नागरिकांच्या शरीराचे उष्मांक आणि प्राणवायूची पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर मास्क, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण यापुढे जाऊन वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदल करण्याबाबतही स्वयंसेवक मार्गदर्शन करणार आहेत.
कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. यात बोलण्याची पद्धत, लिफ्ट वापरण्याची पद्धत, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याची पद्धत, जेवण पद्धत, शौचालयांचा वापर आणि प्रवासाच्या पद्धतीतही बदल करायचा आहे. कोव्हिडचे संशयित रुग्ण शोधणे यासोबतच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारांना प्राधान्य देणे, याबाबींचादेखील मोहीमेत समावेश आहे. मोहिमेच्या कालावधीत दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.
स्वत:साठी
कुटुंबासाठी
आहार आणि व्यायाम
प्रवासादरम्यान
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.