नारायण राणेंना अटक करणाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू

राणे यांना मागील महिन्यात 24 तारखेला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती.
We will take action against those who arrested says Narayan Rane
We will take action against those who arrested says Narayan Rane

नवी दिल्ली : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याच रात्री त्यांना न्यायालयानं जामीनावर सोडलं. आता राणे यांनी अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली आहे. राणे यांनीच याबाबत माहिती दिल्यानं ठाकरे सरकार विरूध्द राणे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (We will take action against those who arrested says Narayan Rane)

राणे यांना मागील महिन्यात 24 तारखेला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात पुणे व नाशिकमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर राणे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी कारवाईची तयारी सुरू केल्याची माहिती दिली. 

माझ्यावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे. त्यासाठी आमच्या वकिलाने तयारी सुरू केली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केलं. यावेळी राणे यांनी राज्यातील इतर मुद्यांवरही प्रतिक्रिया दिली. गीतकार जावेद अख्तर यांनी आरएसएसबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. 

मराठी आरक्षणासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी नुकतीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. त्यावरूनही राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यांना कायदा माहित नाही. ते केवळ चमकायला जातात, असा टोला राणे यांनी लगावला. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या इम्पिरिकल डाटासाठी केंद्राकडं बोट दाखवलं जातं. त्यावरूनही राणे यांनी केंद्र सरकार कोणाताही डाटा लपवून ठेवत नाही, असं प्रत्यूत्तर भुजबळ यांना दिलं. 

चिपी विमानतळ नऊ ऑक्टोबरपासून सुरू

कोकणातील चिपी विमानतळ नऊ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विमानतळावरून दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पहिलं उड्डाण होणार आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री यायलाच पाहिजेत असं नाही. केंद्रीय मंत्री येत आहेत. शिवसेनेने कोकणसाठी काय केले, पर्यटनासाठी काय केले, असे प्रश्न राणे यांनी यावेळी उपस्थित केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com