''विठ्ठलाने चमत्कार करावा..'' मग हे काय करणार..

मुख्यमंत्र्यांच्या या वक्त्यांवरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी आपल्या टि्वरवरून टिका केली आहे. या टि्वटमुळे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
3Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1.
3Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1.

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात शासकीय पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की देवा आता काहीतरी चमत्कार दाखव अन् कोरोनाला आजच्या या आषाढी एकादशीपासूनच दूर कर, असे साकडं घातलं आहे. अशा प्रकारे आषाढी एकादशीला विठ्ठलाची अशी महापूजा करावी लागेल असे स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं, अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली होती. आम्ही मानवांनी आता कोरोनापुढे हात टेकले आहे. त्यामुळे देवा आता चमत्कार दाखवं, असं साकडं विठ्ठला घातलं असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या या वक्त्यांवरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी आपल्या टि्वरवरून टिका केली आहे. या टि्वटमुळे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

नितेश राणे आपल्या टि्वटरमधून म्हणतात की मुख्यमंत्री होण्यासाठी - पवार साहेबांनी चमत्कार केला..आमदार होण्यासाठी - मोदी साहेबांनी चमत्कार केला..आता कोरोना जाण्यासाठी- विठ्ठलाने चमत्कार करावा.. मग हे काय करणार..गोट्या खेळणार मातोश्रीत बसुन ?? याला शिवसेना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार यांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 
"एसटी' म्हणते, चूक झाली, वारीचा धनादेश परत देणार !
 
संत निवृत्तीनाथ पालखी आषाढी वारीसाठी पंढरपुरला शिवशाही बसने नेण्यात आली. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एकाहत्तर हजारांचे बील दिले होते. संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्टने त्यासाठी धनादेश दिला. त्यावरून निर्माण झालेल्या वादावर आता महामंडळानेच पडदा टाकला आहे. ज्यांनी धनादेश घेतला, त्या आगार प्रमुखांना याबाबत माहिती नव्हती. त्यांची चूक झाली. आम्ही हा धनादेश परत करु, असे विभाग नियंत्रक नितीन मैड यांनी सांगीतले. मंगळवारी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिरातून पादुकांसह वीस वारकरी शिवशाही बसने पंढरपुरला गेले होते. ते काल सायंकाळी पोहोचले. दरम्यान यासंदर्भात नाशिक डेपोकडून संत निवृत्तीनाथ ट्रस्टला एकाहत्तर हजार रुपयांचे बील दिले. त्यासाठी संस्थेने त्यांना धनादेश दिला. 

यासंदर्भात राज्य परीवहन महामंडळ आणि संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्ट यांच्यात काहीही वाद नव्हता. मात्र ही बातमी कळल्यावर त्यावर विरोधी पक्ष, राजकीय नेत्यांनी राज्य शासनावर टीका झाली. विशेषतः विरोधी पक्षांकडून याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. यावरुन चांगलेच राजकीय वादळ उठले होते. परीवहन खाते शिवसेनेचे अनिल परब यांच्याकडेच असल्याने त्यात शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे विभागीय नियंत्रकांनी आम्ही धनादेश घेतला, ही संबंधीत अधिकाऱ्याची चूक झाली. तो धनादेश वटवला जाणार नाही. संबंधीतांना तो परत केला जाईल, असे सांगून आता परिवहन महामंडळानेच या वादावर पडदा टाकला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com