शिवसेना आता कन्हैयाकुमार, उमर खालिद यांच्या विचारावर... भातखळकरांचा टोला

किशोरी पेडणेकर यांच्याविधानावरून भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वट करून पेडणेकर व शिवसेनेवर टीका केली आहे.
4Uddhav_20Thackeray_20Atul_20Bhatkhalkar.jpg
4Uddhav_20Thackeray_20Atul_20Bhatkhalkar.jpg

मुंबई : लव्ह जिहाद वरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला आहे. मुंबई येथे आज महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना वाढला, या माझ्या विधानाचा भाजपकडून विपर्यास करण्यात आला आहे. मी केवळ प्रार्थनास्थळे म्हटले नाही तर बारमध्ये जाण्यानेही कोरोना वाढला. लोक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातला आहे. 

भाजप यावरुन केवळ शब्दांचा खेळ करत आहे. लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे., अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी केली. लव्ह जिहाद (Love Jihad) कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले आहे. 

किशोरी पेडणेकर यांच्या या विधानावरून भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी टि्वट करून पेडणेकर व शिवसेनेवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अतुल भातखळकर म्हणतात की अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा  निश्चिय केलेला दिसतोय... हा आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद...

हेही वाचा : अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेला विरोध.. 
पंढरपूर : कार्तिकी यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातल्याने वारकरी महाराज मंडळीतून नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्तिकीसाठी वारकऱ्यांना बंदी असेल तर आमचा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध राहिल असा इशारा वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी आज येथे दिला. कार्तिकी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाने संचार बंदीसह इतर काही निर्बंध घातले आहेत. या संदर्भात आज पुढील दिशा ठरवण्यासाठी येथील वासकर महाराज मठात वारकरी पाईक संघाची बैठक पार झाली. त्यानंतर वासकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध असल्याचे स्पष्ट केले. प्रतिकात्मक पध्दतीने वारी होणार असेल तर शासकीय महापूजा देखील पंढरपुरातील शासकीय अधिकाऱ्यांच्या  हस्ते करावी, अशी मागणी ही त्यांनी केली. वारी संदर्भात सरकारकडे एक प्रस्ताव दिला होता. परंतु त्या प्रस्तावावर देखील कोणतीच चर्चा केली नाही. प्रशासनाने वारकरी संप्रदायाला विचारात न घेता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे येत्या विधान परिषदेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा ही निर्णय घेण्यात आल्याचेही वासकर महाराज यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com