शेतकरी आंदोलन नवा इतिहास घडविणार...  

बाळासाहेब थोरात म्हणाले की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं शोषण करणारे कायदे केलेले आहेत.
बाळासाहेब थोरात25.jpg
बाळासाहेब थोरात25.jpg

मुंबई : दोन महिन्यापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नवा इतिहास घडविणारं हे आंदोलन आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे केले आहेत, त्यांना साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं शोषण करणारे कायदे केलेले आहेत. त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. देशातील शेतकरी त्रस्त झाला आहे. नागपूर येथे काँग्रेसने मोठे आंदोलन केले. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यासाठी आहे, असे माऩण्याचे कारण नाही. केंद्र सरकारने व्यापाऱ्यासाठी हे कायदे करण्यात आले आहे. साठेबाजी करायची, हा सरकारचा डाव आहे. आतून पैसा उभा करून तो राजकारणासाठी वापरता येईल का,  असा विचार ते करीत असावे, त्यांचा निषेध आम्ही करतो. 

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  तीन दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते आजच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या निषेधार्थ नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाद्वारे कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना देण्यात येणार आहे. 

नाशिकच्या गोल्फ क्‍लब मैदानातून निघालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कसारा, भिवंडीमार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकला. हजारो शेतकरी ट्रक, टेंपो, चारचाकी, दुचाकीने मोर्चात सहभागी झाले होते. शेतकरीविरोधी तीनही कायदे रद्द करण्याबरोबरच शेतमालाला पुरेसा मोबदला देणारा हमीभाव देण्याची तरतूद असलेला कायदा करावा, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी सांगितले. 
 
दरम्यान, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसबरोबरच शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे मोर्चाला संबोधित करावे, अशी आमची इच्छा शिवसेना नेतृत्वाकडे व्यक्त केल्याची माहिती कम्युनिस्ट नेते डॉ. ढवळे यांनी दिली. 
 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com