दारुची दुकाने उघडणाऱ्या सरकारला जनतेची फारच काळजी : संभाजी भिडेंची उपहासात्मक टीका 

कोरोना महामारीमुळे बहुसंख्य लोक मरणार आहेत, अशी भीती सरकार निर्माण करत आहे.
Sambhaji Bhide criticizes Thackeray government for not opening temples
Sambhaji Bhide criticizes Thackeray government for not opening temples

नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) : राज्यात उपहारगृहे, दारूची दुकाने आणि सिनेमागृहे सुरू आहेत. परंतु मंदिरे, शाळा, बंद आहेत. या राज्यकर्त्यांना समाजाची फारच काळजी दिसत आहे? अशी उपहासात्मक टीका शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आज (ता. 9 नोव्हेंबर) ठाकरे सरकारवर केली. 

संभाजी भिडे हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका केली. भिडे म्हणाले की, कोरोना महामारीची भीती निर्माण केली गेली आहे. क्वारंटाइनच्या नावाखाली एकमेकाला एकमेकापासून दूर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत जे मृत्यू झाले आहेत, त्यातील  कोरोनापेक्षा भीतीमुळेच जास्त मृत्युमुखी पडले आहेत. 

शेकडो वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारी सुरू आहे, ती परकीयांनी देखील बंद केली नाही. या राज्यकर्त्यांना कोरोना महामारीमध्ये जनतेची काळजी फारच वाटत आहे. यथा राजा, तथा प्रजा. जे जे समाजाला घातक आहे, ते या सरकारने सुरू केले. मात्र, सदभावना व्यक्त करणारी मंदिरे मात्र बंद ठेवली आहेत, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला. 

कोरोना महामारीमुळे बहुसंख्य लोक मरणार आहेत, अशी भीती सरकार निर्माण करत आहे, असा आरोपही संभाजी भिडे यांनी शेवटी बोलताना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com