राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसे म्हणाले, "" मी ना कोणाशी चर्चा केली ना कोणता विचार केलाय !'' 

2019 च्या निवडणुकीत त्यांचे तिकीटही कापण्यात आले. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले मात्र मुलीचाही पराभव झाल्याने या नाराजीत भरच पडली.
राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसे म्हणाले, "" मी ना कोणाशी चर्चा केली ना कोणता विचार केलाय !'' 

मुंबई :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असली तरी खडसे यांनी मात्र आपण याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. 

खडसे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये खर्ची घातले आहे. महाराष्ट्रात दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राज्य पिंजून काढले होते. शिक्षणमंत्री, महसूल मंत्री, विरोधीपक्षनेते आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.

मात्र 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांना असे वाटत होते की आपला मुख्यमंत्रीपदासाठी विचार होईल पण, तसे काही झाले नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवसापासून ते नाराज होते. नाराज असले तरी ते फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री बनले. त्यांना अनेक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही देण्यात आली होती. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. 

सत्तेत असूनही फडणवीस आणि खडसे यांचे म्हणावे तसे जमले नाही. पुढे भोसरी जमीनप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2019 च्या निवडणुकीत त्यांचे तिकीटही कापण्यात आले. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले मात्र मुलीचाही पराभव झाल्याने या नाराजीत भरच पडली.

या ना त्या कारणाने खडसे हे फडणवीसांना लक्ष्य करीत आले. काही दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली. त्यांच्या टीकेला फडणविसांनीही उत्तर दिले. आता ते स्वत:वर झालेल्या अन्यायाबाबत पुस्तक लिहिणार आहेत तसे त्यांनीच जाहीर केले आहे. 

गेल्या काही दिवसापासून नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनी सामशी बोलताना खुलासा केला आहे. ते म्हणाले,की अजून मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांबरोबर चर्चा केलेली नाही. याबाबत मी अजून कोणताही विचार केला नाही. 

वाढीव शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा
 लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यासमोर मुलांच्या महाविद्यालयांचे शुल्क भरायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेक अनुदानित उच्च माध्यमिक महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा सर्रासपणे वाढीव शुल्क घेण्यात येत आहे. 

त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाढीव शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी छात्रभारती संघटनेने शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची अकरावी व बारावी वर्गासाठी सरकारने शुल्क निश्‍चित केले आहे, परंतु लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक महाविद्यालयांनी सर्रासपणे मोठ्या प्रमाणात शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये अनेक महाविद्यालये सरकारने विद्यार्थ्यांकडून निश्‍चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क वसूल करत आहेत. त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com