`राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातियवाद वाढला... हे सर्वांनाच माहिती; मी फक्त बोललो`

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातींमधील द्वेष वाढला या विधानावर राज कायम
raj thackray
raj thackray

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (NCP) जन्मानंतर राजकारणात जातियवाद वाढला, या वाक्याचा पुनरूच्चार राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात पुन्हा केला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके मी वाचलेली आहेत. ही पुस्तके वाचावीत, या शरद पवारांच्या सल्ल्याचा अर्थ मला कळाला नाही. सोयीने प्रबोधनकार घ्यायचे आणि घ्यायचे नाहीत हे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना याविषयीची भूमिका पुन्हा सविस्तरपणे मांडली. मी जे बोललो त्याचा प्रबोधनकार ठाकरे माझे आजोबा यांच्या पुस्तकांचा काय संबंध होता ते मला सांगा. अजूनही आपण जातीपातीत खितपत पडलोय. जात ही गोष्ट शतकानुशतके आहे. सगळीकडेच आहे. मात्र 99 सालापासून जातीपतींचा द्वेष वाढला आणि राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढला, हे सगळ्यांना माहितीय. सर्व पक्षांना माहितीय. मी फक्त बोललो. प्रबोधनकारांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचे विचार त्या त्या कालानुसार होते, प्रबोधनकारांचे विचार पाहिजे ते घ्यायचा आणि बाकीचं सोडून द्ययाच असं सुरु, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने मोर्चे काढले, त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्टपणे सांगा त्यांना. या मुद्यावरून माथी भडकवून, निवडणुकीला मतं मिळतात त्यापलीकडे दुसरं काही सुरू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांचे इतिहासाचे आकलन बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे नसल्याचा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी लगावला होती. त्यावर ज्यांचं काही आकलनचं नाही. त्यावर काय बोलायचं? मी काय वाचतोय हे मला आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. राजकारणासाठी हे एजंट नेमले गेले आहेत. त्यांना हेच हवंय.

मी प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत. य़शवंतराव चव्हाण यांच्याही पुस्तकाचे वाचन केले आहे. त्यांचीही विचारधारा समजून घेतली आहे. पण आपण किती तुटत जायचं याला काही मर्यादा आहे की नाही? उत्तर प्रदेशमध्ये उघडपणे जाती विचारल्या जातात. असा महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे का, असा सवाल त्यांनी केला. 

माझ्यावर  भूमिका बदलण्याचा आरोप होता. मी  काय भूमिका बदलली? शरद पवारांच्या एका वाढदिवशी मी त्यांच्याबद्दल एक भाषण केले होते. वाढदिवसाचा दिवस पाहता काही गोष्टी राखून ठेवल्या पाहिजेत, असे तेव्हा मी म्हणालो होता. वाढदिवस असतो तेव्हा चांगल बोलतो. तसेच पवारांविषयी बोललो. पण काही गोष्टी आता उघडपणे बोलल्या. पुण्यात त्यांची मुलाखतीत घेतली होती.  त्या मुलाखतीत त्यांना महाराष्ट्रचा मूळ विचार कशात आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी अपेक्षेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मूळ असल्याचे त्यांनी सांगितले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com