वीज बिल वसुलीला मनसेचा विरोध...

येत्या 29 जानेवारी रोजी थकीत वीजबिल माफीसाठी मनसेच्या वतीनेतहसील कार्यालयावर मोर्चा काढण्य़ात येणार असल्याचेही धोत्रे यांनी जाहीर केले.
mahavitaram22 - Copy.jpg
mahavitaram22 - Copy.jpg

पंढरपूर : बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरु केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीज बिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करुन देण्याचा साधा विचार जरी केला तरी साखर कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
 
येत्या 29 जानेवारी रोजी घरगुती आणि शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्य़ात येणार असल्याचेही धोत्रे यांनी जाहीर केले. वीज बील वसुलीवरुन येत्या काही दिवसात सरकार आणि मनसेमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

धोत्रे म्हणाले, कोरोना, अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेतकऱ्याच्या शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बील माफ करुन दिलासा देण्याची गरज आहे. उर्जामंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच वीज बिला बाबत परस्पर विरोधी विधाने करु लागली आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली आहे.
 
कोरोना काळात वीज बिलात सवलत देवू म्हणणारे सरकार आता वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा बंद करु, अशी धमकी देत आहेत. परंतु सरकारच्या अशा धमक्यांना शेतकरी भीक घालणार नाहीत. संपूर्ण वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपुरातून सरकारच्या वीज बिल वसुलीला विरोध म्हणून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येथील 29 जानेवारी रोजी शेतकरी शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.

वीज वितरण कंपनी आणि साखर कारखानदारांमध्ये वसुलीसाठी साठेलोटे सुरु आहे.  राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी वीज बिल वसुलीचा ठेका घेतला तरी त्या- त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करु. साखर कारखान्यांनी आधी शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे  पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीचा बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसुल केला तरी कारखाने बंद पाडू असा इशाराही यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला.

यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, सागर बडवे, महेश पवार आदी उपस्थि होते. बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरु केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीज बिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीज बिल वसुली करुन देण्याचा साधा विचार जरी केला तरी साखर कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलीप धोत्रे यांनी दिला.
 
येत्या 29 जानेवारी रोजी घरगुती आणि शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्य़ात येणार असल्याचेही धोत्रे यांनी जाहीर केले. वीज बील वसुलीवरुन येत्या काही दिवसात सरकार आणि मनसेमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

धोत्रे म्हणाले, ''कोरोना, अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेतकऱ्याच्या शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे  विज बील माफ करुन दिलासा देण्याची गरज आहे. उर्जामंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच वीज बिला बाबत परस्पर विरोधी विधाने करु लागली आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली आहे. 

ता. 29 जानेवारी रोजी हजारो  शेतकऱ्याचा  शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल.वीज वितरण कंपनी आणि साखर कारखानदारांमध्ये वसुलीसाठी साठेलोटे सुरु आहे.  राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी वीज बिल वसुलीचा ठेका घेतला तरी त्या- त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करु. साखर कारखान्यांनी आधी शेतकर्यांच्या  गाळप केलेल्या उसाचे  पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीचा  बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या उस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसुल केला तरी कारखाने बंद पाडू असा इशाराही यावेळी दिलीप धोत्रे यांनी दिला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, सागर बडवे, महेश पवार आदी उपस्थित होते.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com