येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच :राहुल गांधी

छत्तीसगडमधील २२ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यालयांच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला.
येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच :राहुल गांधी

रायपूर : मोदी सरकारने देशातील असंघटित क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला नख लावले असून मागील सहा वर्षांच्या कालखंडामध्ये शेतकरी, कामगार आणि लघू उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

सरकारच्या या धोरणामुळे येत्या काळात नव्याने रोजगार निर्मिती होण्याची शक्यता कमीच असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

छत्तीसगडमधील २२ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पक्षाच्या कार्यालयांच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी बोलताना राहुल यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवरून सरकारवर निशाणा साधला.

देशातील असंघटित क्षेत्रातून ९० टक्के एवढे रोजगार निर्माण होतात. नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यात आल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. 

चिदंबरम यांचा पीएमकेअरवर निशाणा 
काँग्रेसने पीएम केअर निधीवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. या निधीची कोणत्याही पातळीवर पडताळणी होऊ नये म्हणून सरकार तो दडवून ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी या निधीच्या अनुषंगाने अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलासा देताना पीएम केअर फंड हा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये वर्ग करण्याचे आदेश द्या अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com