मुंबई : शिवसेना Shiv Sena पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे MNS सरचिटणीस संदीप देशपांडे Sandeep Deshpandeयांनी उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी खोचक टि्वट करीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. नगरसेवक चोरणे, सेल्फी पॉईंट चोरणे, असे प्रकार शिवसेना करीत असल्याचे देशपांडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, 2012 नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का?दुसऱ्यांचे कार्यकर्ते ,नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राजसाहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाईं प्रकल्प. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?
'राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ' म्हणणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केली दिलगिरी
कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ही घोषणा केली. या निर्णयावरूनही राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. 'आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा,' असा टोला संदीप देशपांडे यांनी काल हाणला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.