दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू

दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.
बच्चू कडू 10.jpg
बच्चू कडू 10.jpg

मुंबई : 'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेचे केले आहे. दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे दानवेंच्या विधानावर संतापले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अशा वातावरणात शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.  

दानवे हे मूळचे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे याची सर्वात आधी डीएनए चाचणी करावी लागेल, पुन्हा असे वक्त्यव्य त्यांनी करू नये. या आधी दानवे यांच्या घरावर आम्ही गेलो होतो, आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल का, असे बच्चू कडू म्हणाले.

"उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर गृहविभागाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही," असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. 

फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथील आरोग्य केंद्राचे उद्धाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  केलेल्या भाषणात दानवे यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि काल पुकारण्यात आलेला भारत बंद यावर देखील भाष्य केले.  

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आश्चर्यजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकताच केला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय तुम्हाला तुमचा माल कुठेही नेऊन विकण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला बाजार समितीचा आठ टक्के कर भरण्याची गरज नाही. पण या चांगल्या निर्णयाला देखील विरोध केला जात असल्याचेही दानवे म्हणाले होते.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान या बाहेरच्या देशांचा हात आहे. या आधी देशात सीसीए आणि एनआरसीचा कायदा करण्याचा निर्णय झाला, तेव्हा देखील या देशातील मुसलमांनाना देशाबाहेर जावे लागेल,अशी भिती निर्माण करण्यात आली. पण एका तरी मुसलमानाला देश सोडून जावे लागले का? असा सवाल दानवे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com