मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. यावर 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असे अग्रलेखात म्हटलं आहे.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची ही नवी पद्धत स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्याच वेळी काँग्रेस पक्षातील या संघटनात्मक घडामोडींचा अंदाज व्यक्त झाला होता. नाना पटोले यांनी आता सांगितले आहे की, पक्षाच्या आदेशानुसार आपण काम करू. पटोले यांनी राजीनामा का दिला व पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी का सोपविली हे काही आता लपून राहिलेले नाही. पटोले यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. काँग्रेस पक्षात हे फेरबदल अपेक्षित होतेच. त्यांचा तो अंतर्गत मामला आहे, असे अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात..
नाना पटोले यांची अखेर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी ‘टीम काँग्रेस’ची जम्बो कार्यकारिणीही जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीत 5-6 कार्याध्यक्ष, पंधराएक उपाध्यक्ष असा जंगी पसारा दिसत आहे. म्हणजे नाना हे प्रांतिकचे अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल. मुंबईतही भाई जगताप अध्यक्ष व दुसरे एक चरणजितसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून नेमले आहेतच. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची ही नवी पद्धत स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्याच वेळी काँग्रेस पक्षातील या संघटनात्मक घडामोडींचा अंदाज व्यक्त झाला होता. नाना पटोले यांनी आता सांगितले आहे की, पक्षाच्या आदेशानुसार आपण काम करू. पटोले यांनी राजीनामा का दिला व पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी का सोपविली हे काही आता लपून राहिलेले नाही. पटोले यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. काँग्रेस पक्षात हे फेरबदल अपेक्षित होतेच. त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. अर्थात बाळासाहेब थोरात जाऊन पटोले येत आहेत एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँगेस पक्षाची अवस्था अशी झाली होती की, राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशा वेळी बाळासाहेब थोरातांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले व अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळविले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.