`फडणविसांच्या ज्ञानात भर पडेल आणि राज्यपालांचे ज्ञान `ऑक्सफर्ड`पेक्षाही जास्त`

पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर या निमित्ताने शरसंधान केले...
sharad-pawar--bhagtsingh-koshiyari
sharad-pawar--bhagtsingh-koshiyari

दापोली (जि. रत्नागिरी) : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या गावांची आज पाहणी केली. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राजकीय फटकेबाजीही केली. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोध केला आहे. या परीक्षांबद्दल पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यपालांना टोला लगावला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आयआयटीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कदाचित राज्यपालांचे ज्ञान या सर्वांपेक्षा जास्त असेल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकणाच्या दौर्यावर 11 जूनपासून येत आहेत. त्याबद्दल पवार यांना विचारले असता. त्यांनी अशा आपत्तींच्या वेळी दौरा करावा, म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोमणा मारला.

चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील घरांचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सून काही दिवसातच  सुरू होणार असल्याने लवकरात लवकर घरे बांधण्यासाठी मदत करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केेले.

बागायतदार, मच्छीमार यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, कोरोनाग्रस्तांना अन्नधान्याची जी मदत केली होती ती मदत चक्रीवादळात भिजून गेली आहे. शासनाने चक्रीवादळातील नागरिकांनाही तत्काळ मदत म्हणून केरोशीन बरोबर तांदूळ,  गहु,  डाळीचे वाटप करावेत अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून या आपत्तीसाठी मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्न केले जातील. त्यांच्या आजच्या रत्नागिरी दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पवार यांनी काल रायगड जिल्ह्यातील माणगाव येथुन पाहणी दौ्याला सुरुवात केली. त्यानंतर म्हसळा, दिवेआगर, शेखाडी येथील नुकसानीची पहाणी केली. रायगडमध्ये  पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर , उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमित शेडगे आदींची उपस्थिती होती. काल पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार म्हणजे सर्कस असल्याच्या राजनाथसिंह यांच्या टिकेला उत्तर देताना पवार यांनी एका विदुषकाची कमी असल्याचा टोला लगावला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com