Kirit-Somaiya27f.jpg
Kirit-Somaiya27f.jpg

ठाकरे परिवाराचे 19 बंगले..हिशोब तर द्यावाच लागेल...

कोर्लई गावात 19 बंगले बांधले होते, ते ठाकरे परिवाराचे असल्याचा आरोप किरीट सैामय्या यांनी केला आहे.

मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुंटुबियाचा निकटवर्तीचा संबध होता असा, आरोप भाजप नेते किरीट सैामय्या यांनी काही दिवसापूर्वी केला होता. आता किरीट सैामय्या यांनी अन्वय नाईक यांनी कोर्लई गावात 19 बंगले बांधले होते, ते ठाकरे परिवाराचे असल्याचा आरोप किरीट सैामय्या यांनी केला आहे. याबाबत टि्वट करीत सैामय्या यांनी ठाकरे परिवारावर निशाणा साधला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये किरीट सैामय्या म्हणतात, "2009 मध्ये अन्वय नाईकने कोर्लई गावात 19 बंगले बांधले. तेव्हापासून 4 वर्ष घर प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकने भरला. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2021 पर्यंतचे (8 वर्ष) घरपट्टी, पाणीपट्टी, वीज कर सौ रश्मी उद्धव ठाकरेनी भरले ठाकरे साहेब हिशोब तर द्यावाच लागेल."


 अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्यावेळी पोलिसांना सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

"राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. भाजपला भीती वाटते आहे की 2018 मध्ये अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची केस आपण उगाचच दडपून टाकली. ती केस बंद करून टाकली होती. ती फाईल पुन्हा उघडली, तर आपण अडचणीत येऊ, या भीतीपोटी भाजपच्या नेत्यांचा सध्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून कांगावा सुरू आहे,' अशा शब्दांत माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसापूर्वी हल्लाबोल केला. 

आमदार जाधव हे चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलत होते, त्या वेळी त्यांना पत्रकार अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक आणि भाजप नेत्यांकडून त्यांच्या सुटकेसाठी करण्यात येणारी आंदोलने, सरकारला देण्यात इशारे याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जाधव यांनी भाजपवर वरील आरोप केला. 

Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com