गुन्हा दाखल करून छापे मारायचे, हा अनुभव सर्वांना येतोय! जयंत पाटलांचा संताप

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावरईडीनेशुक्रवारी सकाळी छापा टाकला.
Jayant Patil slams BJP over raid on Anil Deshmukhs house
Jayant Patil slams BJP over raid on Anil Deshmukhs house

उस्मानाबाद : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला. त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने या छापेमारीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. (Jayant Patil slams BJP over raid on Anil Deshmukhs house)

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्व एजन्सीचा वापर केला जात आहे. अनिल देशमुखांकडे काही सापडले नाही. सीबीआयच्या चौकशीतही काही आढळून आले नाही. आता त्यांचे आर्थिक व्यवहार तपासायचे, दहा वर्षांपूर्वीचं काही तरी काढायचं अन् एफ.आय.आर. दाखल करायचा. छापे मारायचे काम सुरू आहे हा अनुभव सर्वांना येतोय, असे म्हणत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. महिन्याभरात ही दुसरी कारवाई आहे. 

या प्रकरणात या पूर्वीही सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. १०० कोटी वसूलीबाबत ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ईडी चौकशीसाठी देशमुख यांना समन्स करू शकते. अनिल देशुख यांच्या भष्ट्र पद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआय अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते. ईडीकडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

''परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.'' असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले होते.

''अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी'', असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com