दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्वाची घोषणा...

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंबंधी आज विधानसभेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली.
vg5.jpg
vg5.jpg

मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंबंधी आज विधानसभेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली. 

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मुनगंटीवार म्हणाले, "दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंबधी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे या परीक्षा आँफलाइन की आँनलाइन घ्यावी, याबाबत चर्चा आहे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी"

यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या की राज्यात डोंगराळ भागात इंटरनेट कनेटिव्हीटी मिळत नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा आँफलाइनच घेण्यात येणार आहे. परीक्षा मुलांच्या शाळेत घ्यायची की अन्य परीक्षा केंद्रावर घ्यायची, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिकाबाबत सह्याद्री वाहिनीवरून, आणि युट्यूबवरून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


पीकविम्याचे पैसे कंपन्यांच्या खिशात...विरोधक आक्रमक...

मुंबई : राज्यात झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनी करत असलेली फसवणूक यावरून आज विधानसभेचा प्रश्नोउत्तरांचा तास गाजला. विरोधी पक्षाने कृषीमंत्री दादा भूसे यांना धारेवर धरले. पिकविमा कंपन्या या शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. 

भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले, "पिकविमा या कोणासाठी आहेत. शेतकऱ्यांसाठी आहेत की विमाकंपन्यांसाठी आहेत, याबाबत सरकारने स्पष्टीकरण केले पाहिजे. या पिक योजनांचे पैसे शेतकऱ्याच्या नाही तर विमा कंपन्यांच्या खिशात जातात. भाजप सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती. सध्या विमा कंपन्यांनी लावलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना एक रूपयांही मिळणार नाही. हे निकष सरकारने बदलावे."

या प्रश्नांना उत्तर देताना कृषीमंत्री दादा भूसे म्हणाले की याबाबत राज्य सरकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नवीन धोरण आणणार आहे. त्यांच्या मंजूरीसाठी ते केंद्र सरकारला पाठविले आहे. पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याबाबत कुठलेही राजकारण केले जात नाही. यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सूचनांचे दखल घेतली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com