पोलिसांच्या बदल्यांवर मी बोलणारच आहे : फडणवीस यांचा इशारा

राज्य सरकारने 45 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या.
devendra-fadanvis-sharad-pa.jpg
devendra-fadanvis-sharad-pa.jpg

पुणे : राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या बदल्यांबाबत मी योग्य वेळ येताच बोलणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नाराजी असून चांगल्या अधिकाऱ्यांना डावलण्यात येत असल्याची तक्रार असल्याचे विचारल्याबद्दल ते म्हणाले की या पोलिसांच्या बदल्यांबद्दल पोलिस महासंचालकांचा अहवाल प्रसिद्ध झाला तर त्यामध्ये कोणाकोणाचा हस्तक्षेप झाला आहे, याची माहिती उघड होईल. ती उघड झाली तर सरकारची अडचण होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल नियमानुसार कार्यवाही होण्याबाबत आग्रही होते, असे बोलले जात होते. त्यावर फडणवीस यांनी बोट ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल्यांवरून बरीच खदखद असल्याची चर्चा होती. त्यातही गृह विभागाकडील बदल्यांकडे अनेकांचे लक्ष होते. यावर आता फडणवीस काय बोलणार, याची उत्सुकता आहे. राज्य सरकारने 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यावरून काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांत वाद असल्याचे सांगण्यात येत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com