Govt panel recommends those testing positive should defer vaccination for 6 months
Govt panel recommends those testing positive should defer vaccination for 6 months

कोरोनातून बरे झाल्यानंतर कधी घ्यावी लस? केंद्र सरकार म्हणते...

कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. यादरम्यान अनेकांना कोरोना (Covid-19) संसर्ग झालेला आहे. पण कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. काही तज्ज्ञ डॅाक्टरांकडून कोरोनातून बरे झाल्यानंतर दीड महिन्यांनी, तीन महिन्यांनी लस घ्यावी असे सांगितले जाते. त्यामुळे लसीकरणाबाबत सध्या गोंधळाची स्थिती आहे. (Govt panel recommends those testing positive should defer vaccination for 6 months)

केंद्र सरकारच्या लसीकरणविषयक तज्ज्ञ समितीने आज याबाबत महत्वाची शिफारस केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, असे समितीने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमधील संभ्रम आता दूर होणार आहे. मात्र, यावरून सोशल मीडियावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

कोरोना लशीचा तुटवडा असल्यानेच सहा महिन्यांनी लस घेण्याचे सांगितले जात असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर संसगर् झाल्यानंतर कोरोनाच्या अॅंटीबॅाडी तीन महिनेच राहत असल्याने सहा महिन्यांचे अंतर कशासाठी? याचे शास्त्रीय कारण काय, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढणार

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही लशींचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्यातच केंद्र सरकारच्या लसीकरणविषयक तज्ज्ञ समितीने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतराबाबत सरकारला महत्वाची शिफारस केली आहे. दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस समितीने केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. मागील तीन महिन्यांत तिसऱ्यांदा दोन्ही डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. मार्च महिन्यात हे अंतर ६ ते ८ आठवडे करण्यात आले होते. अंतर वाढल्याने लशीची परिणामकारकता वाढेल, असे सरकारने त्यावेळी सांगितले होते. तसेच त्यापेक्षा जास्त अंतर असू नये, असेही सरकारने स्पष्ट केलं होतं. 

दरम्यान, कोविशिल्ड ही लस अॅस्ट्राझेनेका व अॅाक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केली आहे. या लशीचा जगातील अनेक देशांमध्ये वापर होत आहे. काही देशांमध्ये लशीच्या दोन डोसमधील अंतर आधीपासून १२ आठवडे करण्यात आले आहे. दोन डोसमधील अंतर अधिक असल्यास परिणामकारकता वाढत असल्याचे संशोधनातून यापूर्वीच सिध्द झाले आहे. सिरम इन्स्टिट्युटकडूनही याबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आले होते. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com