शेतकरी आंदोलनात असंही चित्र... एकीकडं लाठीमार अन् दुसरीकडं गुलाब!

शेतकऱ्यांनी पोलिसांना गुलाब पुष्प व जेवण देत आपुलकीचे दर्शन घडविले. पोलिसांकडूनही आंदोलक शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या भावनांचा आदर केला.
Farmers and police Exchange Roses Amid Delhi Clashes
Farmers and police Exchange Roses Amid Delhi Clashes

नवी दिल्ली : दिल्लीच्या विविध भागांत शेतकरी आंदोलन पेटलेले असताना चिल्ला बॉर्डरवर मात्र आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. शेतकऱ्यांनी पोलिसांना गुलाब पुष्प व जेवण देत आपुलकीचे दर्शन घडविले. पोलिसांकडूनही आंदोलक शेतकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या भावनांचा आदर केला.

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण मिळाल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांनी पोलिसांना दोषी धरत त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 

सिंघु व टिकरी सीमेवर सकाळी हजारो शेतकरी एकत्रित आले होते. तिथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावली होती. प्रजासत्ताक दिनाचे संचलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू होणार होता. पण सिंघु सीमेवर शेतकरी रिंगरोडवरून मोर्चा नेण्याचा आग्रह करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

एकीकडे ही स्थिती असताना उत्तर प्रदेश व दिल्लीच्या चिल्ला बॉर्डरवर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. नोएडाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त रणविजय सिंग यांना भारत किसान युनियनचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष योगेश प्रताप सिंग यांनी गुलाब पुष्प दिले. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी तयार केलेले जेवणही त्यांनी घेतले. संघनेच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणाहून आंदोलनाच्या ठिकाणी येण्यास पोलिसांनी रोखले नाही. त्यामुळे संघटनेकडून पोलिसांना गुलाब देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेतकरी आंदोलकांच्या या भुमिकेवर पोलिसांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले. 

हेही वाचा : मोर्चादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू; आंदोलक आक्रमक

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी ट्रॅक्टर मोर्चादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर काही शेतकरी आक्रमक झाल्याने आंदोलन आणखी चिघळले. ही घटना मध्य दिल्लीतील मिंटो रोडवर दुपारी घडल्याची माहिती आहे. 

दिल्लीत काही भागात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी लावलेली बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवावे लागले. पण शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एका पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली शेतकरी अडकल्याचे आढळून आले. पण त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर काही शेतकऱ्यांनी पोलिसांना दोषी धरत त्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com