राष्ट्रवादीला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या चाणक्याकडे पुणे आणि रायगड जिल्ह्यांची जबाबदारी

राज्यात स्वबळावर भगवा फडकविण्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेने हे संपर्कमंत्री नेमले आहेत.
vaaditya29 (1).jpg
vaaditya29 (1).jpg

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचा नुकताच दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात अनेक शिवसैनिकांनी संपर्कमंत्री नसल्याचे अनेक कामे होत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शिवसेनेच्या जिल्हा संपर्कमंत्र्यांची नेमणुक लवकर करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले आहेत.

अन्य जिल्ह्यातील संपर्कमंत्री पुढीलप्रमाणे 

एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), दादा भुसे (नाशिक, नगर), गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी), संदीपान भुमरे (बीड, लातूर). 

परिवहनमंत्री अनिल परब हे सध्या सेनेचे चाणक्य म्हटले जातात. सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या पुणे आणि रायगड या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यांत सेना आणि राष्ट्रवादीतील कुरबुरी वाढत चालल्या आहेत. रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात सेना आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग दाखल केला आहे. तसेच तटकरे व त्यांची कन्या पालकमंत्री आदिती हे दोघे सेना नेत्यांना विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठकही झाली होती. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील सत्तास्थानांत शिवसेनेला फारसे महत्त्व नसल्याची टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील करत असतात. पुणे शहरात तर सेनेचे स्थान नगण्य झाले आहे. त्यामुळे येथे परब यांची जबाबदारी वाढली आहे. 

हेही वाचा : शिवसेनेकडून अभिनेते सुबोध भावे 

मुंबई : राज्यपालनियुक्त सदस्य हे कला समाजसेवा या क्षेत्रातले असावेत हा निकष असल्याने राजकीय नेत्यांची नावे पुढे केली जाणार नसल्याचेही सांगण्यात येते आहे. विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. कॉंग्रेसची नावे अद्याप मुंबईला मिळालेली नाहीत. दिल्लीतून ही नावे कोणत्याही क्षणी प्राप्त होतील, असे राज्यातले नेते सांगत आहेत. मात्र रात्री उशीरापर्यंत ही नावे येथे पोहोचली नव्हती. युवक कॉंग्रेसला अग्रेसर करणारे सत्यजित तांबे , आक्रमक प्रवक्ते सचिन सावंत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रजनी पाटील या नावांबरोबरच मुजफ्फर हुसेन, नसीम खान आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर ही नावे चर्चेत आली आहेत. अर्थात कॉंग्रेसचे शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही असे एका मंत्र्याने सांगितले.
 शिवसेनेने समाजसेवा साहित्य कलाक्रीडा या क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे जवळपास ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची सावली म्हणून वावरणारे मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com