पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांत आटोपणार; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रामध्ये आहेत.
Devendra Fadanvis criticize Maharashtra Government over assembly session
Devendra Fadanvis criticize Maharashtra Government over assembly session

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसात आटोपते घेतले जाणार आहे. आज राज्य सरकारकडून अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून 5 व 6 जुलै यादिवशी अधिवेशन होईल. दरम्यान, राज्य सरकारकडून कोरोनाचा बहाणा करून अधिवेशन दोन दिवसाचे करत पळ काढल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadanvis criticize Maharashtra Government over assembly session) 

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रामध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच बहुतेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन होत असून राज्य सरकारने 5 व 6 जुलै असे दोनच दिवस अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे. फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 

फडणवीस म्हणाले, कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्याचचेच नाही, अशी सरकारची मानसिकता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, विजेचे गंभीर प्रश्न, कायदा सुव्यवस्थेची बिकट स्थिती याचे सरकारला काही ही पडलेले नाही. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी होत असताना सरकार पावसाळी अधिवेशनही घेण्याची स्थितीत नाही. अजूनही अध्यक्षांची निवड नाही. सरकारला कोणतेही नियम पाळायचे नाहीत. त्यामुळं आम्ही या निर्णयाचा निषेध करतो.

आम्ही प्रश्न विचारू नये, या उद्देशानेच दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जाणार आहे. जनतेचे प्रश्न सरकार मांडू देत नाही. पण आम्ही गप्प बसणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या भांडणात जनतेला वेठीस धरले जात आहे. सरकार आहे की तमाशा आहे, असा प्रश्न पडतो. त्यांच्यात समन्वय नसल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द झालं, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली. 

दरम्यान, राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये मोठी नाराजी आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली आहे. ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारमधील काही मंत्री, आमदारांवर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मागील अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता. यापार्श्वभूमीवर दोन दिवसांचे आदोलन होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com