कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत...तिसरी लाटही येणारच; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

केंद्र सरकारच्या तीन सदस्यांच्या शास्त्रज्ञांच्या पॅनेलने याबाबत अभ्यास केला आहे.
Covid19 second wave to end in july and third wave after six month
Covid19 second wave to end in july and third wave after six month

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच मृतांचे आकडेही जगात सर्वाधिक ठरले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, दिल्लीसह काही राज्यांमध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सीजन व औषधांचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर जाणवला. काही राज्यांतील लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशातील दुसरी लाट जुलै महिन्यापर्यंत राहील, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. (Covid19 second wave to end in july and third wave after six month)

केंद्र सरकारच्या तीन सदस्यांच्या शास्त्रज्ञांच्या पॅनेलने याबाबत अभ्यास केला आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट जुलै महिन्यानंतर ओसरेल, असे सांगण्यात आले आहे. तर तिसरी लाट येणार असून ती सहा ते आठ महिन्यांनी येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पण तिसरी लाट अधिक तीव्र नसेल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी लसीकरण हे एकमेव कारण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शास्त्रज्ञांनी वापरलेल्या मॅाडेलनुसार देशात मे अखेरीस नवी रुग्णांची दैनंदिन संख्या दीड लाखांपर्यंत खाली येईल. तर जुन महिनाअखेरीस हा आकडा २० हजार एवढा असेल.

कोणत्या राज्यांत गाठले टोक?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरयाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी काही दिवसांपूर्वीच टोक (Peak) गाठले असल्याचे पॅनेलचे सदस्य व आयआयटी कानपुर येथील प्राध्यापक महिंद्र अगरवाल यांनी सांगितले. तर तमिळनाडूमध्ये २९ ते ३१ मेदरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक असेल, असेही त्यांनी सांगितले. इतर राज्यांमध्ये अद्याप तेवढी रुग्णसंख्या वाढली नाही. 

तिसऱ्या लाटेची तीव्रता किती?

कोरोनाची तिसरी लाट काही भागापुरतीच मर्यादीत असले. तसेच जास्त लोकांना संसर्ग होऊ शकणार नाही. कारण लसीकरणामुळे अनेकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. तिसरी लाट किमान ऑक्टोबरपर्यंत येणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केलं. 

दुसऱ्या लाटेचा अंदाज चुकला

देशातील दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेबाबत अंदाज व्यक्त करता आला नाही, अशी कबुलीही पॅनेलकडून देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत दररोज दीड लाख रुग्ण आढळतील, अशी अपेक्षा होती. पण आम्ही चुकीचे ठरलो, असे प्राध्यापक विद्यासाकर यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com