देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या प्रयत्नातून... 

आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
1Covaxin.
1Covaxin.

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेत इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले. 


आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्वाच्या १३ ते १४ हॉस्पीटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलै पर्यंत या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगीतल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी  सांगितले.

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूमुखी पडणाऱ्या रूग्णांची संख्यादेखील वाढत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर पुण्यासह राज्यातील अनेक शहरातील व्यवहार बऱ्यापैकी सुरळित झाला आहे. गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात असलेला ३.८१ मृत्यूदर या महिन्याच्या सुरवातीला ४.३८ वर पोचला आहे.

तपासण्यांची संख्या वाढल्याने मृत्यूदरात काहीशी वाढ झाल्याचे राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील आधिकारी सांगत आहेत. मात्र, तपासण्यात वाढ केल्याने या काळात अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आल्याचे आधिकारी सांगत आहेत. पुण्यासह राज्यात तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. राज्यात सध्या ११० लॅबमध्ये कोरोनाची तपासणी होत आहे. यामध्ये खासगी व सरकारी लॅबचा समावेश आहे. 

तपासण्या वाढवा मृत्यूदर कमी होईल, असे सूत्र सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या महिनाभरात तपासण्या वाढविल्यानंतर मृत्यूदरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागातील तज्ञांच्या मतानुसार झालेली वाढ केवळ ०.५७ इतकी आहे. वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत वाढ फारशी झालेली नाही. उलट चाचण्यांची संख्या वाढवल्याने महिनाभरात आपण अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवू शकलो आहे.चाचण्यांची संख्या वाढली नाही तर प्राथमिक अवस्थेत रूग्ण सापडण्याचे प्रमाणदेखील कमी होते. 

अत्यवस्थ झाल्यानंतर तर रूग्ण रूग्णालयात दाखल झाला तर मृत्यू होण्याची शक्यता असते. यातूनच मृत्यूदर वाढतो. येत्या काळात लॅबची संख्या वाढविण्याबरोबरच तपासण्यांची संख्या राज्यभरात आणखी वाढविण्यात येणार असल्याचे या यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. राज्याच्या इतर शहरांचा विचार केला तर तुलनेने पुणे व मुंबईत रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यानंतर जळगाव व सोलापूर शहरात मृत्यूदर अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुण्यात व्यवहार सुरळित झाले. मात्र, शहराच्या जवळपास सर्वच भागात आता रूग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या वाढली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com