आता शिवसेनेची देण्याची वेळ..हात आखडून केंद्रांकडे बोट दाखवू नका..फडणवीसांचा टोला 

उद्धव ठाकरे ,देवेंद्र फडणवीस आज कोकणच्या दैाऱ्यावर आहेत
12Devendra_20Fadanavis_20_20Uddhav_20Thakrey_0_1.jpg
12Devendra_20Fadanavis_20_20Uddhav_20Thakrey_0_1.jpg

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोकणच्या दैाऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील वातावरण चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात कोकणवासियांनी काय मदत मिळते,  याकडे सगळ्याचे लक्ष आहे. तौते वादळाच्या (Tauktae Cyclone) पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत. devendra fadnavis criticism uddhav thackeray on kokan Tauktae Cyclone visit 

विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत बाधितांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारी राजकारण न करता मदत करून कसा दिलासा देता येईल याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देत आहेत. 
 
"कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौते वादळ, यात लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिवसेनेची देण्याची वेळ आली आहे ; मात्र हात आखडता घेऊन केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. राजकारणात जेवढे प्रेम दाखविले जाते तेवढे आपत्ती काळातही कोकणावर सेनेने प्रेम दाखवावे," अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारली.
 
"मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सिंधुदुर्गमध्ये पोहोचल्यानंतर मालवण मधील वायरी गावातल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत. ते नक्कीच महाराष्ट्राला मदत करतील. नुकसानीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे ते केंद्राच्या निकषाप्रमाणे आम्ही मदत देणार आहोतच. राज्य सरकार म्हणून आणखीन जे काही करता येणे शक्य आहे ते केले जाईल. एकूणच दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून कोकणाला काय मिळणार, याकडे मात्र कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज तौते चक्रीवादळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मालवण व वेंगुर्ला येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी देखील त्यांनी चर्चा केली. "कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  “मी हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार,” असाटोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. 

"येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  मला कोणत्याही परिस्थितीचं राजकारण करायचं नाही, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही," असे ठाकरे म्हणाले.
 
चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामधून सुमारे 10 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. किनारी भागातील मच्छिमार बांधव आणि हापूस व काजू बागायतीचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com