पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद...

पूजा चव्हाण प्रकरणाची चैाकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
pccv25.jpg
pccv25.jpg

पुणे : टीकटाँक स्टार पूजा चव्हाण प्रकरणी आता भाजप आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज सकाळी पूजा चव्हाण ही ज्या प्लॅटमध्ये राहत होती. तेथे पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिसांवर आरोप केले. 

चित्रा वाघ म्हणाल्या की पोलिस हे रक्षक नसून भक्षक आहेत. या प्रकरणात साधी तक्रारही वानवडी पोलिसांनी दाखल केली नाही, वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लगड यांची भूमिका संशयास्पद आहे. 'आमचा या प्रकरणाशी काही संबध नाही,' अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणाची चैाकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

 
पूजा राहत असलेला फ्लॅट सील आहे. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली? का तिला खाली ढकलले गेले ? हे प्रश्न कायम आहेत, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. त्या आज दुपारी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. 

पोहरादेवीत गर्दी जमवण्यासाठी मंत्र्यांकडून केली होती विशेष व्यवस्था ?
 
पंधरा दिवसांनंतर जनतेसमोर येताना वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करण्याकरीता दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला टार्गेट देऊन लोकांना पोहरादेवी येथे नेण्याबाबत सांगितले होते. पंचायत समितीनुसारही असेच टार्गेट देण्यात आले होते. 

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून २५ ते ३० गाड्या पोहरादेवीला नेण्यात आल्या असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. याशिवाय त्यांच्या इतर समर्थकांनी जमेल तसे आणि जमेल त्या वाहनांनी लोकांना पोहरादेवी येथे नेले. त्यामुळे तेथे एका वेळी येवढी गर्दी झाली. नाही तर कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला असताना लोकांनी स्वतःहून येवढा प्रवास करून जाणे सहज शक्य वाटत नाही. दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. 

तिन्ही तालुक्यांतील पंचायत समितीसुद्धा शिवसेनेच्याच ताब्यात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा राठोडांनी शक्तिप्रदर्शनासाठी उचलला असल्याचेही बोलले जात आहे. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिचा ८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मानवाडी परिसरात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. विरोधी पक्ष तर त्यांच्यावर तुटूनच पडला. घटनेनंतर ते १५ दिवस गायब होते. काल बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे ते प्रगटले. एकप्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनच केले. पण येवढे हजारो लोक पोहरादेवीला स्वतःहून गेले की त्यांना नेण्यात आले, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com