भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नव्हती

नारायण राणे यांच्यावर केलेली कारवाई आतातायीपणे झाली.
 Chandrakant Patil, Uddhav Thackeray .jpg
Chandrakant Patil, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांना मंगळवारी अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राणे यांच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाला. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाबाबत भाष्य केले. (Chandrakant Patil said on the suspension of 12 MLA)  

भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंब झाले आहे. त्या विषयी पाटील म्हणाले, विधानसभेत गोंधळ होऊ नये म्हणून मी वैयक्तिक भास्कर जाधवांशी बोललो. त्यांना मी सांगितले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या. तसे ते गेलेही. मात्र, नंतर जे झाले ते आपण पाहिले. बारा आमदारांच्या निलंबनाची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती. काँग्रेसही आग्रही नव्हती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे निलंबन झाले, असा आरोप पाटील यांनी केला.

नारायण राणे यांच्यावर केलेली कारवाई आतातायीपणे झाली. राणे शिवसेनेवर टीका करत होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले होते. कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी त्यांना अटकेचे नाट्य करावे लागले. राणे यांची बोलण्याची वेगळी शैली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचीही शैली वेगळी आहे. त्यांना तसे म्हणावे का लागले हा प्रश्न आहे. राणे भाजपमध्ये आहेत म्हणून सोबर बोलत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. नारायण राणे असे काय बोलले? मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याला काय म्हणायचे हे त्यांना कळत नाही. त्यावर ते बोलले. हा नियमीतचा ग्रामीण संवाद होता, असे पाटील म्हणाले.  

राणेंच्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेला. चुकीचे वाटले तर त्यांना बोलण्यासाठी अनेक लोक आहेत. उपसभापती कोणत्याही पक्षाचा नसतो. त्यामुळे आम्ही नीलम गोऱ्हें यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पेनामध्ये भयंकर ताकद असते, असेही पाटील यांनी सांगितले.     

नारायण राणेंना अटक झाली, या घटनेचा भाजपला फायदा होईल का, असा प्रश्ना त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर राणे म्हणले, ही घटना घडली आहे. त्यामध्ये भाजपला फायदा होईल की तोटा होईल याचा काही प्रश्न नाही. महाराष्ट्रातील चारही मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कालच्या घटनेमुळे फायदाच होईल. असेही पाटील म्हणाले. ज्या प्रकारे अटक झाली ते चुकीचे आहे. आज सर्वे केला तर लोक सांगतील की ही काय मंत्र्यांना अटक करण्याची पद्धत नाही, असे घराघरामध्ये बोलले जात आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे कधीच मारामाऱ्या झाल्या नाहीत. 

राणे यांना अटक झाली त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई अधिक गतीने होईल का, असे विचारले असता पाटील म्हणले, असे काही होणार नाही. काहीतरी केले तरच इडीची कारवाई मागे लागते. राणे यांच्यामुळे भाजप-शिवसेना युतीवर परिणाम होईल का, त्यावर पाटील म्हणले, शिवसेना-भाजपचे सरकार असताना राणे भाजपमध्ये आले. नारायण राणे यांच्यामुळे भाजप-शिवसेना युतीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. कालचा निर्णय आताताइपणे झाला. कालच्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा डागाळली आहे. नियम तोडून विधानसभेचा अध्यक्ष निवडला नाही तर अध्यक्ष भाजपचा असेल. अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. तुम्ही का आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवली नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com