भाजपवाले दोन हजार लोकांचा फायदा करून देणार अन्‌ सांगणार वीस लाख ! 

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे कमलनाथाना नेहमीच लक्ष्य करतात आणि त्यांच्या घराणेशाहीवरही बोट ठेवतात
 भाजपवाले दोन हजार लोकांचा फायदा करून देणार अन्‌ सांगणार वीस लाख ! 

भोपाळ : हे (भाजपवाले) करून देणार दोन हजार लोकांचा फायदा आणि सांगणार वीस लाख लोकांना याचा फायदा झाला असे सांगत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

माजी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम केल्याने त्यांच्या समर्थक 24 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या चोवीस जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने टाकले आहेत.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे कमलनाथाना नेहमीच लक्ष्य करतात आणि त्यांच्या घराणेशाहीवरही बोट ठेवतात. त्यांच्या काळात राज्याचे कसे नुकसान झाले त्यांचा कारभार कसा योग्य नव्हता हे ही ते सांगत असतात. मात्र त्यांनी काही दिवसापूर्वी मी परमनंन्ट मुख्यमंत्री नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यात पोटनिवडणुकीचे निकाल काय लागणार याकडेही देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे मित्र असले तरी तेही आता मध्य्प्रदेशच्या प्रचारात उतरणार आहेत. पायलट हे जेव्हा नाराज होते तेव्हा शिंदे हे त्यांचे कौतुक करणारे ट्विट रोज करीत होते. मात्र पायलट यांनी कधीही कॉंग्रेसच्या विरोधात ब्र ही काढला नाही. आता हेच पायलट कॉंग्रेससाठी मैदानात उतरणार आहेत. 

कमलनाथ यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे, की आता यांचे राजकारण पुरे झाले. भाजपवाले खोटे बोलत असतात. ही मंडली दोन हजार लोकांचा फायदा करून देणार आणि वीस लाख लोकांचा फायदा झाला म्हणून सांगणार पण, लोकही आता यांना ओळखून आहेत. ते फसणार नाही. राज्यातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळेल. राज्यातील जनता सत्याच्या बाजूने आपला कौल देतील. मतदार खूप हुशार असतो त्याला चांगले वाईट कळत असते असेही कमलनाथ यांनी म्हटले आहे. 


हे ही वाचा : 
आता यांची नजर शेतकऱ्यांच्या जमीनीवर 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्राने जे कृषी विधेयक आणले आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्तीसगडमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की आता गोदामात कोणीही कितीही माल ठेवू शकतो. आता काही लोक अन्नधान्यावर नियंत्रण ठेवतील. त्याचा सामान्य लोकांवर खूप परिणाम होणार आहे. आतापर्यंत यांनी एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन विकली आता यांची नजर शेतकऱ्यांच्या जमीन आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com