भाजपला हा निर्णय मान्य अन्य पक्षांनीही तो स्वीकारावा..

कृषी कायद्याबाबत न्यायालायाचा निर्णय भाजप स्वीकारत आहे, अन्य पक्षांनीही हा निर्णय स्वीकारावा
SB13.png
SB13.png

नवी दिल्ली : ''न्यायालयाचा सन्मान हाच देशाचा सन्मान आहे. कृषी कायद्याबाबत न्यायालायाचा निर्णय भाजप स्वीकारत आहे, अन्य पक्षांनीही हा निर्णय स्वीकारावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज दिली आहे. 

संबित पात्रा यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा विकास हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत करून अन्य पक्षांनीही त्या मार्गाने पुढे जावे.  

नव्या कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय काल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने अखेर तिन्ही कृषी कायद्यांना अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत सगळेच सदस्य सरकारधार्जिणे असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांनी ही समिती नाकारली आहे. 

शेतकरी जवळपास दीड महिन्यापासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. विविध सीमांवर हजारोंच्या संख्येने आंदोलक ठाण मांडून आहेत. या आंदोलनात वयोवृद्ध, महिला आणि मुलांचाही समावेश आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु त्यावर तोडगा निघालेला नाही.


आज लोहडीच्या निमित्ताने तिनही कृषी कायद्यांची प्रत शेतकऱ्यांच्या वतीनं जाळण्यात येणार आहे. ता. 18 जानेवारी रोजी महिला शेतकरी दिवस साजरा करण्यासाठी, 20 जानेवारी रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या आठवणींमध्ये शपथ घेणं आणि 23 जानेवारी रोजी आझाद हिंद शेतकरी दिवसाच्या निमित्ताने देशभरातील राजभवनांना घेराव घालण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी देशभरातील शेतकरी दिल्लीला जाऊन शांततेत 'शेतकरी गणतंत्र परेड' आयोजित करणार आहेत.

कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यावर काल  निकाल सुनावण्यात आला. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल सुनावला. न्यायालयाने तिन्ही कृषी कायद्यांना अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. याचबरोबर या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती कृषी कायद्यांवर न्यायालयाला अहवाल सादर करेल. 

न्यायालयाच्या या निकालानंतर शेतकरी संघटना या समितीसमोर हजर होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण शेतकरी संघटनांनी कालच स्पष्ट केलं होतं की, कायद्यांच्या स्थगितीचं आम्ही स्वागत करु, पण कोणत्याही समितीसमोर हजर होणार नाही. तसेच त्यांनी शेतकरी आपलं आंदोलन सुरु ठेवणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. आज संध्याकाळी शेतकरी तीनही शेतकरी कायद्यांची प्रत जाळून लोहडी साजरी करणार आहेत.

सुप्रिया सुळे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला त्याचे स्वागत.कोर्टाच्या या निर्णयाबद्दल मी त्यांची आभारी आहे.केंद्रातील सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे.या कायद्यांबद्दल सर्व घटकांना विश्वासात घ्या अशी आम्ही मागणी करत होतो.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com