भाजप आध्यात्मिक आघाडीचं तुळजाभवानी मंदिर परिसरात आंदोलन सुरू.

तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
30tuljapur.jpg
30tuljapur.jpg

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्यातील मंदिर सुरु करावीत, या मागणीसाठी विविध संघटना, राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री 12 पासून ते पुढील 24 तास  तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 मीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. 

त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार मंदिर परिसरात घडू नये, यासाठी प्रशासनांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 तुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्याच चित्र सध्या पहायला मिळतं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे. 

‘राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही’, अशी टीका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. काल राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

तुषार भोसले म्हणाले की प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही , जोपर्यंत मंदिर खुले होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.  

या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत गुरुवारी भाजप आध्यात्मिक आघाडीकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं.  तुषार भोसले यांना पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली आहे.   


हेही वाचा : उदयनराजे म्हणाले, "मराठा संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम.. 
 
सातारा :  "आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. माझ्या मते आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे," असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (गुरुवार) येथे व्यक्त केले. सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानतो. राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "मी मराठा म्हणून कधी मला संबोधले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो. तेव्हा तुम्ही पाहायचा का हा इथला तो तिथला. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकोन." 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com