…ही तर बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग..राणेंचा शिवसेनेवर निशाणा   

आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
nitesh8.jpg
nitesh8.jpg

मुंबई : मुंबईत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून शेतकरी आठवडी बाजार भरवण्यात येत आहेत. हे आठवडी बाजार बंद पाडण्याचे षडयंत्र महापालिका करीत असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे. तर दुसरीकडे लाँकडाऊनचे नियम मोडत अभिनेत्री दिशा पटनीच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. 

यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. दिशा पटनी, डिनो मोरीया यांना सर्व नियम तुडवण्याची परवानगी आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

प्रसाद लाड यांचा वेगळा न्याय आणि दिशा पटनी हिला वेगळा न्याय, ही सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग आहे, अशी टीका नितेश राणे यांची केली आहे. जर आठवडी बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला तर येत्या काळात हा संघर्ष वाढेल असा इशारा यावेळी प्रसाद लाड यांनी दिला. तर मुंबईच्या नाईटलाईफला समर्थन करायचे आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई महापालिकेच्या भूमिकेविरोधात प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आहे. शेतकऱ्यांनी महापालिका प्रशासनाला घाबरू नये, महापालिका जोपर्यंत कारवाई थांबवित नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करतच राहू, असे नितेश राणे यांनी सांगितले. 

हेही वाचा : ठाकरे सरकारची आज 'सर्वोच्च' परीक्षा 

मुंबई  : मराठा आरक्षणाची सुनावणी आजपासून सुरू होत आहे. या सुनावणीची काय तयारी झाली आहे, याचा आढावा घेण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच बैठकी झाली आहे. बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय न्याय व विधी मंत्री रविशंकर प्रसाद, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.    

"मराठा आरक्षणाबाबत सरकारला जी मदत अपेक्षित आहे, ती सगळी मदत आम्ही सरकारला करू. मराठा आरक्षण हा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. केंद्राकडून काही काही मदत हवी असल्यास आम्ही ती मिळवून देऊ," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या एसईबीसी आरक्षणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने नुकतीच बैठक घेतली होती. उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या सुनावणीच्या तयारीच्या आढाव्यासह मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली आहे.  

सुनावणीबाबत सर्व मुद्यांची बैठकीत समिक्षा करण्यात आली. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला व राज्याची भूमिका पुन्हा एकदा केंद्राला कळविण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com