मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे धुळफेक असल्याची टीका केली जात आहे. आज भाजप नेते नारायण राणे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांचा संदर्भ देत राणे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्र्यांनी अघोषित संचारबंदी सुरू केली आहे. त्यामुळे व्यापार संपणार आहे. लघुउद्योग संपतील. कामगार उध्वस्त होतील. मुंबईत भिकाऱ्यांची संख्या सव्वा लाख आहे. त्यांच्या उपजिविकेच काय करणार ? १५०० हजार च्या पॅकेज मध्ये रिक्षा चालक कसे उपजिविका चालवतील?, असे राणे यांनी नमुद केले.
नागरिकांकडून नियम पाळले जात नसतील तर अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यावरून बोलताना राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. "पेट्रोल पंप बंद केले तर इमर्जन्सीला लोकांना काय मातोश्रीवरून सचिन वाझेची गाडी पाठवणार का," असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
महाराष्ट्रात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना हातळण्यास कमी पडलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. राज्यात जवळपास ६० हजार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. देशातील ४१ टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात आहेत. मृतांची संख्या वाढणे हे राज्य सरकारच अपयश आहे, असेही राणे यांनी नमुद केले.
दरम्यान, राणे यांनी अनिल परब यांना एनआयए उचलून नेईल, असेही वक्तव्य पत्रकार परिषदेत केलं आहे. अनिल देशमुख यांनी चौकशीत परब यांचेही नाव घेतलं आहे. त्यामुळे परब यांच्या चौकशीसाठी केवळ राज्यपालांची परवानगी घ्यावी लागेल. ते आले नाहीत तर एनआयए त्यांना उचलून नेईल, असे राणे म्हणाले.
Edi
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.