0ashish_shelar_and_sanjay_raut_20_ff.jpg
0ashish_shelar_and_sanjay_raut_20_ff.jpg

'सामना'चे अग्रलेख हे व्हॅाटस्अॅप युनिव्हर्सिटीच्या आधारे..आशिष शेलारांचा टोला

'सामना'चे अग्रलेख हे व्हॅाटस्अॅप युनिव्हर्सिटीच्या आधारे असतात,'' असे सांगत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली आहे.

मुंबई : "सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या संपादकांचे लेख हे अभ्यासावर असतात. पण 'सामना'चे अग्रलेख हे व्हॅाटस्अॅप युनिव्हर्सिटीच्या आधारे असतात,'' असे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता 'सामना'च्या अग्रलेखांवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले की बांग्लादेशाचा जीडीपी भारताच्या ११ टक्के आहे, 'सामना'मध्ये भारताची तूलना बांग्लादेशाशी करण्यात आली आहे. हे चुकिचं आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर काल टीका केली होती. यावर शेलार म्हणाले की दानवे यांनी हे सरकारला येड्या गबाळ्याचे सरकार म्हटलं आहे. पण हे सरकार येड्या गबाळा आणि बदमाषांचं सरकार आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत "माझं कुटुंब माझी जबाबदारी" हि कसली जबाबदारी आहे, असा सवाल विचारला. एकट्या मुख्यमंत्र्यांनाच बाहेर पडले तर कोरोना होतो का? माजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले आणि आजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले, ते जनतेला माहिती आहे. नसेल माहिती तर आता जनतेला माहिती होईल, अशी टीका काल केली आहे.

मी स्वत: राज्याच्या अनेक ठिकाणी जाऊन आलो. जनतेची कामे केली. तरी पण मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना सर्व मदत केली. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर देखील जायला तयार नाही. या राज्याची अवस्था `अमर, अकबर, अँथनी` सारखी झालीय, अशी टीका मी केली तर माझ्यावर सारे तुटून पडले. पण या तीन पक्षांच्या तिघांची तोंडे तीन दिशांना आहेत.

मराठा आरक्षणासारखा विषयावर सरकारचे एकमत नाही. त्यावर एकत्र बसा चर्चा करावी, असं सरकारला वाटत नाही. सारी जबाबदारी अशोक चव्हाणांवर टाकून हे सरकार मोकळे झाले आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. "सरकार चालवणं येड्या गबाळ्याचे काम नाही. त्याला काम करणाराच माणूस लागतो," अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर तोफ डागली होती.
 

''देर आये दुरुस्त आये'...' आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : बॅालीवुडला वाचविण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. आता त्यांना बाहेर पडण्याचं शहाणपण सूचले आहे. केंद्राची मदत असो की राज्याचं कर्ज.. त्यांना कर्ज मिळणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करतील, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. 'देर आये दुरुस्त आये'', अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राज्यातील पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर शेलार पत्रकारांशी बोलत होते. 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com