मुंबई : बॅालीवुडला वाचविण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. आता त्यांना बाहेर पडण्याचं शहाणपण सूचले आहे. केंद्राची मदत असो की राज्याचं कर्ज.. त्यांना कर्ज मिळणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा मुख्यमंत्री पूर्ण करतील, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
'देर आये दुरुस्त आये'', अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राज्यातील पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर शेलार पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्याच्या दैाऱ्यावर आशिष शेलार यांनी आज टीका केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत, महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अशा स्थितीत ते मात्र घरात बसून महाराष्ट्राच्या नकाशावर पूरस्थितीची पाहणी करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यावर विरोधकांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस नितेश राणे यांनीही ही या मुद्द्यावरून टीका केली होती. आता ८० वर्षांचे पवार दौरा करून मुख्यमंत्र्यांपुढे उदाहरण घालून देत आहेत. यातून तरी मुख्यमंत्री शिकून घराबाहेर पडणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यावर याबाबत टीका केली होती. "मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण, आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन (online) बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा "ठाकरे' नावावरील विश्वास उडेल," असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे, त्याला शेताच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याची गरज आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने पंचनाम्याचा आदेश देऊन भागणार नाही, तर या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन हे काम करावे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी ट्विटमधून केली आहे.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.