राष्ट्रवादीला डिवचण्याचा काँग्रेसचा प्लॅन : ओबीसी आरक्षणाचा लढा बारामतीतून...

आम्ही जागृत राहिलो, तरच आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मला राजकीय भाषण करायचे नाही.
  Vijay Vadettiwar .jpg
Vijay Vadettiwar .jpg

मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी  (OBC Reservation) लढा तीव्र करणार असल्याचे राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. लोकांना विषयांची विस्तृत माहिती देण्यासाठी ओबीसी समाजाच्या रोज जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये बैठका सुरु आहेत. ओबीसी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्यासाठी २२ जुलैपासून मेळावे घेणार आहे. त्या अंतर्गत 29 जुलैला बारामतीमध्ये ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा वडेट्टीवार यांनी यावेळी केली. (Announcement of Vijay Vadettiwar at OBC meet in Baramati on 29th July) 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीकडे लक्ष द्यावे, लागेल असे म्हटले होते. त्यातच आता वडेट्टीवार यांनी मेळाव्याची घोषणा केल्यामुळे बारामती पुन्हा चर्चेत आली आहे.

ओबीसी आरक्षण टिकावे, महामंडळांना निधी द्यावा आणि घरकुल मिळावे, यासाठी आगामी दोन महिन्यांमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत. त्यासाठी २२ जुलै पासून राज्यभर मेळावे घेणार आहे. ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून ६ ऑगस्टला बीडमध्ये मोर्चा काढणार आहे. ओबीसींनी एका झेड्यांखाली यावे आणि आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी हे मेळावे होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी समाजामध्ये जनजागृती करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आरक्षण संपवण्याचा घाट काही लोकांचा आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.  

भटक्या जमातींना कुठेही न्याय मिळालेला नाही. मी जरी मंत्री असलो तरी सगळेच प्रश्न सुटू शकत नाहीत. कारण तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे काही मर्यादा आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येणार आहे. एकत्र येवून सगळे प्रश्न प्रभावीपणे मांडले तर मार्ग निघेल. येथे सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही आमंत्रित केले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मेळाव्यात त्या जिल्ह्यातील नेत्यांना बोलवणार आहे. सर्व ओबीसी बांधवांनी मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले. 

आम्ही जागृत राहिलो, तरच आमचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मला राजकीय भाषण करायचे नाही. ओबीसी समाज जागृत झाला तर त्यांचे आरक्षण कोणीच संपवू शकणार नाही. कोणत्याही पक्षाला ओबीसीशिवाय पर्याय नाही. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे काही प्रश्नांवर एकमत होते, काही प्रश्नांवर एकमत होत नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी आरक्षणासंदर्भात भेट घेतली. त्या विषयी वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यांनाच आरक्षणचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com