तुम्ही पोलिस फोर्स वापरून राणेंना अटक करा! अनिल परबांचा व्हिडीओ व्हायरल

वॉरंटशिवाय अटक करण्याच्या पोलिस कारवाईवर नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्यामुळे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला होता.
 Anil Parab, Narayan Rane .jpg
Anil Parab, Narayan Rane .jpg

मुंबई : जनआशीर्वाद यात्रा घेऊन संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी तेथेच अटक करण्यात आली होती. सुमारे दीड तासाहून अधिक काळ हे अटक नाट्य रंगले होते. वॉरंटशिवाय नारायण राणेंना अटक करण्याच्या नाट्याचे खरे सूत्रधार परिवहन मंत्री अनिल परबच (Anil Parab) आहेत, या संदर्भात एक व्हिडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यावरुन आता परब अडचणीत येण्याची शक्ता आहे. भाजपने त्यावर पर यांच्यावर टीका केली आहे. (Anil Parab's video clip goes viral) 

वॉरंटशिवाय अटक करण्याच्या पोलिस कारवाईवर नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्यामुळे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी परब हे डीपीडीसीच्या बैठकीत होते, त्यांच्या शेजारी आमदार भास्कर जाधव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बसले होते. पोलिस अधीक्षकांशी परब यांची चर्चा सुरू असतानाच जाधव यांनी ‘राणे यांचा जामीन अर्ज सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे,’ असे परब यांना सांगितले. त्यांना राणेंनी अटक वॉरंटची मागणी केल्याचे अधीक्षकांनी सांगितल्यानंतर परब म्हणाले की, ‘न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलिस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा.’ 

त्याच वेळी त्यांनी राणे हे घरात बसले आहेत, पोलिस त्यांना ओढून बाहेर काढत आहेत. पण, राणे (फोनवर नाव न घेता) त्याला विरोध करत आहेत, असेही त्यांनी शेजारी बसलेल्या सामंत आणि जाधवांना सांगितले. संभाषण संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राणेंच्या अटकेबाबत विचारले असते, ‘त्याबाबत मला काही माहिती नाही. गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला आहे. मी तर रत्नागिरीत बसलो आहे, चला, असे सांगून ते निघून गेले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे भाजपने म्हटेल आहे.    
 
दरम्यान, गोळवली येथील कार्यक्रम आटोपून अल्पोपाहार सुरू असतानाच अचानक जिल्हा पोलिस अधीक्षक गर्ग स्वतः आपल्या ताफ्यासह गोळवली येथे दाखल झाले होते. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नाशिकला जाईपर्यंत अटक होऊ नये, अशी मागणी करणारा राणे यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तातडीने सूत्रे हलवत मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने धाव घेण्यात आली. तोपर्यंत अल्पोपाहार आटोपून कोर्टाचा निर्णय होईपर्यंत इथून हलायचे नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पस्थळी प्रचंड पोलिस फौजफाटा उपस्थित होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com