खबरदार, जर शशिकलांशी बोलाल...पक्षातून 16 पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी

पक्षाच्या कार्यकारिणीच्या या कठोर निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.
AIADMK expels 16 party functionaries who interacted with V K Sasikala
AIADMK expels 16 party functionaries who interacted with V K Sasikala

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamilnadu) राजकारणात व्ही. के. शशिकला यांच्या पुनरागमानाच्या संकेतामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. अण्णाद्रमुकमधील नेते सतर्क झाले असून पदाधिकाऱ्यांना शशिकलांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शशिकलांशी बोलणाऱ्या 16 पदाधिकाऱ्यांना आज थेट पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पक्षाचे प्रवक्त्यांनाही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी करण्यात आली. (AIADMK expels 16 party functionaries who interacted with V K Sasikala)

पक्षाच्या कार्यकारिणीच्या या कठोर निर्णयामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. शशिकला यांनी फोनवरून साधलेला संवाद एक नाटक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. शशिकला या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती सहकारी आहेत. त्यांचे पक्षामध्ये अनेक समर्थकही आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकमधील नेत्यांमधील अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारी संपल्यानंतर पुन्हा राजकारणात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 

तमिळनाडूमध्ये शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यानंतर अण्णाद्रमुकमध्ये खळबळ उडाली. याच क्लीपची दखल घेत पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली. शशिकला यांच्या बोलल्याचा ठपका 16 पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पक्षाच्या प्रवक्त्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचे आरोप करत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. शशिकला यांच्या समर्थकांना एकप्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. 

काय म्हणाल्या शशिकला?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये शशिकला या आपण परत येणार असल्याचे संकेत देतात. 'चिंता करू नका, मी पक्षातील समस्या लवकरच दूर करेन. सगळ्यांनी धीट बनवा. कोरोना महामारी संपल्यानंतर मी परत येईन,' असे त्या अण्णाद्रमुकच्या पदाधिकाऱ्याशी बोलताना म्हणाल्या. त्यावर त्या पदाधिकाऱ्यानेही आम्ही तुमच्या पाठिशी राहू, असे आश्वासनही त्यांना दिले. या ऑडिओ क्लीपमुळे पक्षातील त्यांचे समर्थक सक्रीय झाल्याची चर्चा असून लवकरच वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोण आहेत शशिकला?

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटकेनंतर त्यांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. यामागे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष अडचणीत आल्याचे कारण आहे. मात्र, शशिकलांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com