आमदार गायकवाड यांच्या कुंटुबातील 12 जणांना कोरोनाची लागण

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्याकार्यालयातील 2 कर्मचारीही बाधित झाले आहेत.
corona2.jpg
corona2.jpg

बुलढाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कार्यालयातील 2 कर्मचारीही बाधित झाले आहेत.  

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संकट गडद होत असतानाच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

यात आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, आमदार गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

सोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार असल्याची माहिती आमदार गायकवाड़ यांनी दिली आहे.  आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्या सोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. आज 6 मार्चला आमदार गायकवाड घरी येणार असले तरी घरी किंवा कार्यालयावर सध्या कुणी संपर्क करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. रविवारी संध्याकाळी आमदार गायकवाड पुन्हा मुंबईला जाणार आहेत.

हेही वाचा : कृषी कायद्यांबाबत दोन्ही काँग्रेस धोरण दुटप्पी...  
 
मुंबई : दिल्ली मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर वंचित बहुजन आघाडीच्यावर्तीने आज धरणे आंदोलनं करण्यात आले.राष्ट्रवादी व कोंग्रेसच्या युती सरकारने २००६ मध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विनिमय व विनिमय सुधारणा) कायदा केला आहे. केंद्राचा आजचा काळा कायदा हा याच कायद्यावर आधारित आहे. म्हणून राष्ट्रवादी व काँग्रेस युती सरकारने २००६ साली केलेला कृषी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आजच्या धरणे आंदोलनाद्वारे केली आहे. कृषी हा राज्याचा विषय आहे व त्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदा करता येत नाही. परंतु एखाद्या राज्याने कृषी कायदा केला तर तो योग्य आहे, या सबबी खाली तो संपूर्ण देशभर लागू केला जाऊ शकतो. वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या आंदोलनाची हि मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठराव करावा की, “महाराष्ट्र हा कायदा तर स्वीकारणार नाहीच व केंद्र सरकानेही हा कायदा मागे घ्यावा”.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com