राष्ट्रवादीची सत्ता आली तरच आपले अस्तित्व टिकणार आहे

स्वतःसाठी मी कधीच त्यांच्याकडे पद मागितले नाही.
Solapur District NCP meeting in Wadala
Solapur District NCP meeting in Wadala

वडाळा ( जि. सोलापूर) : गेली 50 वर्षांपासून मी खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून कार्य करीत असून स्वतःसाठी मी कधीच त्यांच्याकडे पद मागितले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात कशा येतील, यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागले तरच आपले सर्वांचे पक्षातील अस्तित्व टिकून राहील, असे सांगून मतभेद विसरुन पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असा आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी केले (Solapur District NCP meeting in Wadala)

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा आढावा बैठक वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन साठे बोलत होते. या वेळी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, गोवर्धन चवरे, लतीफ तांबोळी, राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्योग व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवराज पाटील, जि.प.सदस्य शिवाजी सोनवणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, ज्योत्स्ना पाटील, सुवर्णा झाडे, राष्ट्रवादी, वडाळ्याचे सरपंच व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, दक्षिणचे तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे, दिलीप सिद्धे, प्रकाश चवरे, विजयसिंह देशमुख यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपसातील मतभेद बाजूला सारुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट कसा होईल, यासाठी प्रत्येकाने काम करावे, असा सल्ला आमदार बबनराव शिंदे यांनी या वेळी दिला.

परस्पर नेमणुकाचा अधिकार कोणी दिला : उमेश पाटील

जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, एकेकाळी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भक्कम बालेकिल्ला होता. आज आपला एकही खासदार नाही. सात आमदार निवडून येण्याची क्षमता असतानाही प्रत्यक्षात मात्र उलट स्थिती आहे. अनेक कमिट्यांवर परस्पर नेमणुकीचा अधिकार कुणी दिला. गाडीच्या दरवाजा उघडणाऱ्यांना हा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या वेळी जिल्ह्यातील अनेक तालुक्ं‍यात राष्ट्रवादी कशी कमकुवत आहे, हे आपल्या भाषणातून दाखवून देत कार्यकत्यांना तिथे बळ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले.

भाषण करणे सोपे : राजन पाटील

माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, भाषण करणे सोपे असते. पण लोकांचे संसार उभे करणे अवघड असते. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात पक्षाची स्थिती विदारक आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता वैफाल्यग्रस्त झाला आहे. यासाठी या बैठकीत चिंतन होणे आवश्‍यक आहे. जनता सुप्त अवस्थेत असते. संधी येताच मतदानातून व्यक्त होत असते.

या वेळी खेड येथील एसव्हीआयटीमधील कोवीड सेंटरमध्ये 90 दिवस रुग्णांना आहार देण्याचे स्तुत्य काम केल्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अतिश बचुटे, अविनाश गोंगाणे, प्रकाश काळे, देवा माने, अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. बंकलगीचे सरपंच हनुमंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रफीक नदाफ मौलवी यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रल्हाद काशीद यांनी प्रास्तविक केले. जयदीप साठे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com