दोन्ही छत्रपतींकडे मराठा समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी द्या : शिवेंद्रसिंहराजे 

राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे.
Shivendrasinharaje Bhosale .jpg
Shivendrasinharaje Bhosale .jpg

सातारा : राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे. त्यासाठी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सुरू केलेल्या आण्णासाहेब पाटील विकास फौंडेशनच्या उद्‌घाटनप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले, डॉ. दिलीप येळगावकर, एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, रमेश पोफळे, आदी उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अण्णासाहेबांनी मराठा आरक्षणाचा पाया घातला. आता त्याचा कळस आपण गाठत आहोत. पण मुद्दाम काहीजण या आरक्षणाच्या प्रश्नात खोडा घालण्याचे काम करत आहे. आरक्षण मिळू नये म्हणून न्याय हक्कापासून गरजूंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचा दृष्टीकोन टोलवाटोलवीचा झाला आहे. त्याला आपण सर्वजण कारणीभूत आहेत. कारण आपण संघर्ष करण्याची भूमिका कधी घेतली नव्हती. 

मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यानंतर सरकार जागे झाले. आता आणखी एखाद्या कोपर्डीच्या घटनेची वाट पहातोय का, असा प्रश्न उपस्थित करून राजकीय पक्ष बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. तरच हा लढा आपण जिंकू याचा विचार केला पाहिजे. राजकीय चौकटी बाजूला ठेऊन एकत्र येणे गरजेचे आहे. 

या चळवळीचे नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे. साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली पाहिजे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. मराठा समाजासाठी नरेंद्र पाटील यांची तळमळ दिसत असून समाजासाठी त्यांनी त्यांच्यातील एक व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या मनातील तळमळ पाहून त्यांच्या कार्यांच्या मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे.

फौंडेशनला ताकद देणार...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकविले होते. पण, सध्या या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे.

त्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. नरेंद्र पाटील यांनी सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघटना निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com