भालकेंना धक्का : पहिल्या फेरीतच भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

त्यांना धक्का मानला जात आहे.
In the first round, BJP candidate Samadhan Avtade is leading
In the first round, BJP candidate Samadhan Avtade is leading

पंढरपूर : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी ४५० मतांची आघाडी घेतली आहे. आवताडे यांन पहिल्या फेरीत २८४४ मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके हे पहिल्याच फेरीत पिछाडीवर पडले आहेत. त्यांना २४९४ मते मिळाली आहेत. हे सुरुवातीचे कल असेली तरी सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार आवातडे यांनी आघाडी घेतली आहे. 
दरम्यान, ही पहिली फेरीत पंढरपूर तालुक्यातील मतांची मोजणी करण्यात आहे. पंढरपूरमध्ये भालके यांना आघाडीची अपेक्षा असताना भालके यांच्या गृहतालुक्यातच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतल्याने त्यांना धक्का मानला जात आहे.

पंढरपुरात रविवारी (ता. 2 मे) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण 14 टेबलवरून 38 फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जात आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी उशिर लागण्याची शक्यता आहे. येथील शासकीय धान्य गोदामात पोलिस बंदोबस्तात ही सारी प्रक्रिया पार पडत आहेत. पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी करण्यात आली आहे.  

या निवडणुकीत एकूण  2 लाख 34 हजार मतदारांनी 17 एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी 160 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्रात येणार्या मतमोजणी प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. शिवाय 50 टक्के मतमोजणी प्रतिनिधींसाठी पीपीई कीट देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राजवळ जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

 राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी मतदान झाले. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून उद्योगपती समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी आणि भाजपकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. आवताडे आणि भालके समर्थकांनी विजयाचा दावा केला असला तरी दोन्ही उमेदवारांच्या मतांत फारसा फरक राहणार नाही, पाच ते दहा हजाराच्या मताधिक्याने उमेदवार विजयी होईल, असाही अंदाज दोन्ही बाजूंनी व्यक्त होत आहे. अवताडे यांच्यासाठी प्रशांत परिचारकांना जोरात काम केले. त्यामुळे पंढरपुरात त्यांना चांगली साथ मिळेल, असे सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादीला स्वाभिमानीच्या उमेदवारीचा फटका बसणार की सोय होणार, याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होत आहेत. स्वाभिमानीची मते भाजपला जाऊ नये यासाठी राजू शेट्टी यांनी उमेदवार उभा केला, असे राष्ट्रवादीचे समर्थक सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com