मुख्यमंत्र्यांनी आषाढीला पंढरपुरला जाणे उचित ठरेल का...? 

आषाढीला पंढरपूरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण, कोरोनाच्या संकटामुळे तेथे जावे की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय अन् ते स्वत: याबाबत विचार करीत आहेत.
Uddhav_Thackeray_
Uddhav_Thackeray_

मुंबई : कोरोनामुळे आषाढी वारीची शेकडो वर्षाची परंपरा खंडीत झाली. महाराज मंडळी आणि बाहेरील लोकांना जर पंढरपूरात प्रवेश बंदी आहे. कोरोनचा संसर्ग टाळण्यासाठी पंढरपूरात प्रवेश बंदी आहे. आषाढीला पंढरपूरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण, कोरोनाच्या संकटामुळे तेथे जावे की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय अन् ते स्वत: याबाबत विचार करीत आहेत. मुख्यमंत्री भल्या पहाटे सामान्य वारकऱ्याबरोबर पंढरीच्या पावन भूमीत दर्शन घेतात. पण, या वेळी जर हा ताफा गेला तर किमान २०० गाड्या आणि हजार माणसांनी तेथे जाणे उचित असेल काय, याचा विचार केला जातो आहे. 

वारीवर बंदी आली असून पालख्या हवाईमार्गे दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: गेले तर ते हवाईमार्गे जावू शकतील काय ? मुंबईहून रस्त्याने गेले तर किती वेळ लागेल याची गणिते आखली जात आहेत. गेल्या वर्षी मुख्यमंत्रीपदावर असलेले देवेंद्र फडणवीस वारीत साप सोडले जातील, अशा बातम्या आल्याने पंढरपूरला गेले नाहीत. त्या प्रमाणेच कोरोनाची साथ लक्षात घेता जाणे रद्द करावे काय, तसे करणे परंपरा खंडित करणारे ठरेल काय ? यावरही विचार सुरू आहे. ठाकरे कुटुंबाने या संबंधी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु ठेवली आहे. येत्या एकदोन दिवसात याबद्दलचा निर्णय अंतिम केला जाईल.  

चातुर्मासासाठी पंढरपूरात आलेल्या महाराजांना पंढरपूर मध्ये राहण्याची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. अशातच आषाढी एकादशी महापूजेसाठी जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. कोरोनाचा हॅाटस्पॅाट असलेल्या मुंबईमधून मुख्यमंत्री पंढरपूर येणार आहेत, त्यांनी रस्त्याने वाहनाने यावे का हवाईमार्गाने यावे, याबाबत अजून निर्णय झाला नाही. मराठा आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपुरात येण्यास विरोध करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर श्री विठ्ठलाची पुजा केली होती. तशी पुजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील का ? अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

हेही वाचा  : ठाकरेंचे काम उत्तम; सरकार पाच वर्षे टिकणार 

पुणे : देशावर संकट असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे कुणाचे काय चुकले, यावर चर्चा करण्यापेक्षा संकटाच्या या काळात सर्वांनी एकत्र येऊन सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरूवारी व्यक्त केले. एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पवार यांनी चीनच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शक्‍य होईल तेवढ्या लवकर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली. देशासमोरच्या संकटावर चर्चा करण्यासाठी संसद हे सर्वात प्रभावी व महत्वाचे माध्यम आहे. संसदेत चर्चा झाली तर देशातील लोकांना वस्तुस्थिती काय आहे, ते समजेल. त्यामुळे संसदेचे अधिवेशन बोलाविण्याची गरज आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com