परराज्यांतील 2300 मच्छीमार आपापल्या गावी रवाना: अस्लम शेख

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विविध मच्छीमार सोसायट्यांशी संपर्क साधून पोलिस आयुक्त झोन 11 यांच्या सहकार्याने नियोजन केले.
two thousand three hundred migrant fishrmen sent back by maharashtra government
two thousand three hundred migrant fishrmen sent back by maharashtra government

मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची व्यवस्था राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. याद्वारे 2300 मच्छिमार व खलाशांना श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विविध मच्छीमार सोसायट्यांशी संपर्क साधून पोलिस आयुक्त झोन 11 यांच्या सहकार्याने नियोजन केले. महाराष्ट्र राज्याच्या सागरी क्षेत्रात मढ, भाटी, मुंबई उपनगर, मुंबई शहर सह सात सागरी जिल्ह्यांमध्ये मासेमारी व्यतिरिक्त नौका दुरुस्ती, नौका बांधणी, जाळी विणणे व बांधणी, बर्फ कारखाने, मासळी प्रक्रीया उद्योग, मासळी व्यापार या वेगवेगळ्या कामांतून शाश्वत रोजगार उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातोल मच्छीमार महाराष्ट्रात येतात. 1 ऑगस्ट ते 31 मे हा मासेमारी हंगम असल्याने व 1 जुन ते 31 जुलै सागरी मासेमारीवर बंदी असल्याने हे मच्छीमार आपापल्या राज्यांमध्ये परतत असतात.

मढ मच्छीमार वि.का.स., मढ दर्यादिप संस्था, हरबादेवी मच्छीमार संस्था, मालवणी मच्छीमार संस्था या सोसायट्यांचे मिळून 2300 मच्छीमार व खलाशी  ट्रेन्समधून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांकडे रवाना झाले. श्री. अस्लम शेख यांनी या मच्छीमारांना रेल्वेस्थानकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 45 पेक्षा जास्त बेस्ट बसेसची व्यवस्थादेखील केली. 

वंचित बहुजन आघाडीत ओबीसीविरुद्ध बुद्धिस्ट वाद  
अकोला : भारिप-बहुजन महासंघाच्या पायावर उभी असलेल्या वंचित बहुजन आघाडीला अल्पावधितच गटबाजीची लागण झाली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाला छेद देत काहींनी ‘वंचित’मध्ये ओबीसीविरुद्ध बुद्धिस्ट असा वाद सुरू केला आहे. अशा कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे इशारा पत्रच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे वंचित बहजुन आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरून पक्षाच्या अपयशाचे व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यातून वरिष्ठ पातळीवर झालेल्या परिवेक्षणातून पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरुपाचे निरक्षणे नोंदविण्यात आली. त्यात जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी एकदा पद मिळाले की पक्ष बांधणी सोयीस्कररीत्या विसरून जातात.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com