कोल्हापूर : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. येथे एका युवतीला अशा प्रकारे जीव गमवावा लागणे, हे खेदाचे आहे. मंत्री संजय राठोड युवतीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची माहिती समोर येत असून त्याचे पुरावेही आहेत. अशावेळी राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही तर येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, "एका युवतीचा मृत्यू होतो. तिच्या मोबाईलमधून जे रेकॉर्ड मिळतात, त्यावरून अनेक बाबी समोर येतात. तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणारे दोन बॉर्डीगार्ड त्यावेळी कोठे होते? त्या युवतीचा गर्भपात करणारे डॉक्टर कुठे आहेत? युवतीचा शवविच्छेदन अहवाल कोठे आहे? या बाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. सरकारने या सर्व घटनांची चौकशी करून जनतेला उत्तरे देणे आवश्यक होते; पण त्यांनी तसे केले नाहीच; पण तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या मंत्री संजय राठोड यांचा राजीनामाही घेतला नाही. अधिवशेन सुरू होण्यापूर्वी राठोड यांच्यावर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना अधिवेशनात बोलू देणार नाही. महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे या प्रश्नावर का बोलत नाहीत? सारा समाज त्यांना हा प्रश्न विचारत आहेत.''
मुख्यमंत्र्यांना खुर्चीची काळजी
अन्यायाविरोधात आवाज उठावणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे आहेत. ते, सत्यवादी आहेत; पण व्यवहारात त्यांचा सत्यवादीपणा दिसत नाही. पुरावे समोर असूनही ते राठोड यांच्यावर कारवाई करत नाहीत. प्रत्येकवेळी ते आपली खूर्ची वाचवण्याच्या प्रयत्नातच दिसतात, अशी टीकाही श्री. चंद्रकांत पाटील यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.