त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही : आमदार देवेंद्र भुयार

कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यात शेट्टी यांना यश आले पण आमदार देवेंद्र भुयार यांची समजूत ते कशी काढणार हा प्रश्न आहे.
 swabhimani party mla devendra bhuyar on minister post
swabhimani party mla devendra bhuyar on minister post

पुणे : "स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बड्या नेत्यांमुळे मला मंत्रिपद मिळाले नाही असा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला होता. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'देवेंद्र भुयार यांची समजूत काढू. ते नवखे आहेत" असे म्हटले आहे. मात्र या दोन नेत्यांच्या  विधानानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील एक नवा वाद समोर आला आहे. हा वाद मिटविण्याचे आव्हान राजू शेट्टी यांच्यासमोर आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांची समजूत काढण्यात शेट्टी यांना यश आले पण आमदार देवेंद्र भुयार यांची समजूत ते कशी काढणार हा प्रश्न आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनीही, "आम्हाला महाविकास आघाडीकडून एक मंत्रिपद मिळणार होते मात्र आमच्या नेतेमंडळीनी ते गांभीर्याने घेतले नाही" असे सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत विधानपरिषदेची जागा कोणी स्विकारायाची यावरून वाद सुरू झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सावकार मादनाईक आणि जालंधर पाटील यांनी बंड केले. हे बंड मिटत असतानाच दरम्यानच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बड्या नेत्यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही" असे विधान केले. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीतील वाद हे सगळे पूर्वनियोजित होते."
असेही ते म्हणाले. यावर शेट्टी यांनी,"भुयार नवखे आहेत. त्यांची समजूत काढू' असे म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कोल्हापूर जिल्ह्यातील वाद मिटला असला तरी देवेंद्र भुयार यांच्या निमित्ताने अजून एक नेता पक्षातील नेत्यांवर नाराज आहे हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र भुयार हे मोर्शी मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव करून ते विजयी झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कर्मभूमीत शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पराभव झाला असतानाच भुयार यांनी मात्र विदर्भात विजय मिळवला. देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले,"महाविकास आघाडीकडून आमच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळणार होते मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही, त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही."

केवळ विद्वान आहे म्हणून कलावंत, साहित्यिकाला विधान परिषदेवर पाठवू नका: रामदास फुटाणे

पुणे : "कलावंत किंवा साहित्यिक केवळ विद्वान आहे म्हणून त्याला विधानपरिषदेत पाठवणे चुकीचे आहे. कलावंत-लेखक समाजाच्या उपयोगाचा असावा. तो माणूस म्हणून मोठा असावा," असे मत माजी आमदार आणि कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com